31 जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करावेत Twitter/ @ANI
देश विदेश

31 जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करावेत

प्रत्येक बोर्ड स्वायत्त व स्वतंत्र आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरातील सर्व राज्य शिक्षण मंडळांच्या State Board of Education मूल्यांकनासाठी Evaluation एकसारखी योजना असू शकत नाही. असे निरीक्षण नोंदवत बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court असा आदेश देण्यास नकार दिला आहे. प्रत्येक बोर्ड स्वायत्त व स्वतंत्र आहे. म्हणून, न्यायालय त्यांना समान योजना अवलंबण्याचा निर्देश देऊ शकत नाही.

प्रत्येक मंडळाने आपला आराखडा तयार करावा

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठसमोर ही सुनावणी पर पडली. आम्ही संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी योजना तयार करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. प्रत्येक मंडळाला स्वतःची योजना तयार करायची आहे. त्यांना याबद्दल बरेच काही माहित आहे आणि त्यांना योग्य सल्ला देण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ आहेत.

सर्व शिक्षण बोर्डानी 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर करावा

सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळाला आजपासून दहा दिवसांच्या आत मुल्यांकन योजनेची अधिसूचना द्यावी व अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह सीबीएसई आणि आयसीएसई सारख्या निर्दिष्ट टाइमलाइन बनविण्यास सांगण्यात आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT