Nirmala Sitharaman Criticized Rahul Gandhi ANI
देश विदेश

Nirmala Sitharaman On Rahul Gandhi : अदानींना काँग्रेसनेच बंदर 'गिफ्ट' दिलं, अर्थमंत्री बरसल्या; मोदी-अदानी संबंधांबाबत म्हणाल्या...

Nirmala Sitharaman Attack On Rahul Gandhi : सुरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींना गुन्हेगार संबोधले आहे.

Chandrakant Jagtap

Nirmala Sitharaman Criticized Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवा आदानींसोबत संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यानी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी पंतप्रधानांवर बिनबुडाचे आरोप लावण्याचा गुन्हा वारंवार करत आहेत असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.

विशेष म्हणजे सुरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींना गुन्हेगार संबोधले आहे. त्या म्हणल्या “आम्ही 2019 च्या निवडणुकीपूर्वी देखील हे पाहिले होते आणि आताही ते पुन्हा तेच करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील या सर्व खोट्या आरोपांतून ते काही धडा घेतील असे वाटत नाही". सीतारामन बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

तसेच केरळमधील काँग्रेस सरकारनेच विझिंगम बंदर अदानी समुहाला ताटात वाढून दिले होते. हा निर्णय कोणत्याही निविदेच्या आधारे घेण्यात आला नव्हता असा आरोप निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समाचार घेताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या "जर काही चुकीचे काम होत असेल तर ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांमध्ये होत आहे. पण राहुल गांधी त्याबद्दल एक शब्दही काढणार नाहीत.

राहुल गांधी यांच्या मी गांधी आहे, सावरकर नाही या विधानाचा देखील सीतारामन यांनी समाचार घेतला. त्या म्हणल्या, पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी राहुल गांधींनी दोन वेळा लेखी माफी मागितली आहे आणि आज ते म्हणतात की ते गांधी आहेत, सावरकर नाहीत", असा पलटवार त्यांनी राहुल गांधींवर केला. (Latest Political News)

उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान यांच्यातील काँग्रेसच्या कथित संबंधांबद्दल विचारले असता निर्मला सीतारामन म्हणाल्या, "राहुल गांधींना वाटत असेल की अदानींना या सर्व 'गोष्टी' दिल्या आहेत, तर ते खरे नाही. काँग्रेस सरकारनेच अदानींना विझिंजम बंदर ताटात सजवून दिले. ते कोणत्याही निविदेच्या आधारे दिलेले नाही. आता तेथे त्यांचे सरकार नाही, सीपीएमचे आहे. परंतु केरळने तो आदेश रद्द करण्याची मागणी करण्यापासून त्यांना कशाने रोखले? असा सवाल देखील विचारला.

तसेच "राजस्थानमध्ये संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्प अदानीला देण्यात आला. 2013 मध्ये जसे पंतप्रधान मनमोहन सिंग देशाबाहेर असताना त्यांनी अध्यादेश फाडला होता, तसेच ते अदानीसोबतचा राजस्थान करार का फाडत नाहीत?" असा सवाल देखील सीतारामन यांनी विचारला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT