वृत्तसंस्था : मुलीचे लग्नासाठीचे किमान वय वाढवण्याशी संबंधित एका विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी देण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) याविषयीचे संकेत दिले होते. मुलींचे लग्नाचे किमान वय सध्या १८ वर्ष आहे. ते वाढवून २१ करण्याचा सरकारचा (government) विचार आहे. त्याकरिताची तयारी सरकारने सुरुवात केली आहे.
हे देखील पहा-
याविषयीचे विधेयक याच अधिवेशनामध्ये मांडले जाण्याची शक्यता आहे. सध्या संसदेचे (Parliament) हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लग्नाचे किमान वय वाढवण्याकरिता बाल विवाह कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. या कायद्यामध्ये सध्या मुलींचे लग्नाकरिता किमान वय १८ वर्षे आहे. कायद्यामध्ये बदल करण्याकरिता सुधारणा विधेयकाला बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये (cabinet) मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे. मुलींच्या लग्नासाठी (marriage) किमान वयाबद्दल निर्णय घेण्यासाठी मागील वर्षी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. त्या टास्क फोर्सने लग्नासाठीचे किमान वय १८ वर्षावरून २१ वर्षे करण्याचा सल्ला दिला होता. माजी खासदार (MP) जया जेटलींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केले होते. त्यावेळी मोदींनी भाषणात लग्नासाठीचे किमान वय वाढवण्याविषयी संकेत दिले होते. सध्याची परिस्थिती बघता लग्नाचे वय वाढवण्यासंदर्भामध्ये विचार व्हायला हवा, असे मोदी म्हणाले होते.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.