आखाती देशातील युद्धामुळे सेवा होती बंद
युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्याहून दुबईला जाणारी सेवा बंद करण्यात आली होती.
मात्र आता पुणे दुबई विमानसेवा पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे
प्रवासी विमानसेवेत सोबत दुबई कार्गो सेवेला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात पिक विमा वरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.हायकोर्टातून शेतकऱ्यांना 227 कोटी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र त्यानंतर विमा कंपनी सुप्रीम कोर्टात गेली. यावेळी सरकारचे कंपनी धार्जिण भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे शेकडो कोटी अडकून पडल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.93 कोटी न्यायालयात जमा करावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत.तर कोणताही आदेश नसताना 134 कोटी सरकारी वकीलाच्या म्हणण्यावर जिल्हाधिकारी यांनी अडकून ठेवल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला. त्यामुळे सरकार कोणाच आहे शेतकऱ्यांच की कंपनीच असा संतप्त सवाल पाटील यांनी केला. 2020 च्या पिक विमा बाबत आता संभ्रमाचे वातावरण तयार आहे.
खामगाव येथील अकोला बायपासवर धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. खामगावचे रहिवासी गोपाल गावंडे हे मेहकरकडे लग्नासाठी जात असताना कारच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून बाहेर पडताच काही क्षणांत कारने पेट घेतला. आगीने संपूर्ण कार भस्मसात झाली असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी अडीच एकरावरील 600 गोण्या कांद्याची काढणी केली होती
मात्र एक रुपया किलोचा भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.