Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
देश विदेश

Maharashtra News Live Update: कांद्याचा भाव एक रुपया कीलो, संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा दिला पेटवून

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : तामिळनाडूत विजय यांचा शपथविधी, विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पुणे दुबई विमानसेवा पुन्हा सुरू

आखाती देशातील युद्धामुळे सेवा होती बंद

युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्याहून दुबईला जाणारी सेवा बंद करण्यात आली होती.

मात्र आता पुणे दुबई विमानसेवा पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे

प्रवासी विमानसेवेत सोबत दुबई कार्गो सेवेला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे.

सरकारच्या कंपनी धार्जिण भूमिकेमुळे शेतकऱ्याचे पिक विम्यात मोठे नुकसान

धाराशिव जिल्ह्यात पिक विमा वरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.हायकोर्टातून शेतकऱ्यांना 227 कोटी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र त्यानंतर विमा कंपनी सुप्रीम कोर्टात गेली. यावेळी सरकारचे कंपनी धार्जिण भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे शेकडो कोटी अडकून पडल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.93 कोटी न्यायालयात जमा करावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत.तर कोणताही आदेश नसताना 134 कोटी सरकारी वकीलाच्या म्हणण्यावर जिल्हाधिकारी यांनी अडकून ठेवल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला. त्यामुळे सरकार कोणाच आहे शेतकऱ्यांच की कंपनीच असा संतप्त सवाल पाटील यांनी केला. 2020 च्या पिक विमा बाबत आता संभ्रमाचे वातावरण तयार आहे.

खामगाव अकोला बायपासवर धावत्या कारला भीषण आग ...

खामगाव येथील अकोला बायपासवर धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. खामगावचे रहिवासी गोपाल गावंडे हे मेहकरकडे लग्नासाठी जात असताना कारच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून बाहेर पडताच काही क्षणांत कारने पेट घेतला. आगीने संपूर्ण कार भस्मसात झाली असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News Live Update: कांद्याचा भाव एक रुपया कीलो, संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा दिला पेटवून

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी अडीच एकरावरील 600 गोण्या कांद्याची काढणी केली होती

मात्र एक रुपया किलोचा भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Points Table : गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ, RCB-पंजाबला जोरदार धक्का, वाचा कोण कोणत्या क्रमांकावर?

Constipation Problems: पोट साफ न होण्यामागे ही आहेत ५ धोकादायक कारणं; वेळीच व्हा सावध अन्यथा...

हायहोल्टेज ड्रामा! अखेर संख्याबळाचा घोळ सुटला, थलपतीचाच 'विजय'; आज शपथविधी

अडचणीत मित्र साथ देतील, महालक्ष्मींची कृपा राहील; ५ राशींच्या लोकांना अफाट धनसंपत्ती अन् प्रेम मिळणार

मराठीत 94 हजार विद्यार्थी नापास, मातृभाषेतच 8 टक्के मुलांची दांडी गुल

SCROLL FOR NEXT