लोकसभा अध्यक्षपदासाठी 26 जून रोजी होणार निवडणूक, 3 जुलैपर्यंत चालणार संसदेचे अधिवेशन
Lok Sabha Speaker Election Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदासाठी 26 जून रोजी होणार निवडणूक, 3 जुलैपर्यंत चालणार संसदेचे अधिवेशन

Satish Kengar

अठराव्या लोकसभेचे कामकाज 24 जून रोजी सुरु होणार आहे. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 26 जून रोजी संसदेच्या नवीन अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून रोजी सुरु होईल आणि 3 जुलै रोजी संपेल.

लोकसभेच्या आगामी अधिवेशनात सर्व निवडून आलेले खासदारही शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि पुढील पाच वर्षांसाठी नवीन सरकारचा रोडमॅपबद्दल माहिती देतील.

याआधी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी सांगितले होते की, 18 व्या लोकसभेचे पहिले सत्र 24 जूनपासून सुरू होईल. ज्यामध्ये नवनिर्वाचित संसद सदस्य शपथ घेतील आणि खालच्या सभागृहाच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील आणि लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल.

लोकसभेच्या अध्यक्षांची निवड सामान्यत: लोकसभेच्या सदस्यांच्या पहिल्या बैठकीत केली जाते. सभापती निवड होण्याआधी एका खासदाराची प्रो-टेम अध्यक्षपदी (मर्यादित कालावधीसाठी) निवड केली जाते. प्रो-टेम अध्यक्ष नवीन खासदारांना शपथ देतात. तसेच नवीन अध्यक्षांची निवड प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली होते.

दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांची पुढील बैठक जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात बोलावली जाऊ शकते. ज्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. यासह निर्मला सीतारामन या सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT