Lockdown Saam tv
देश विदेश

Lockdown: भारतात लॉकडाऊन लागणार का? केंद्र सरकारकडून आली अधिकृत माहिती, वाचा लेटेस्ट अपडेट

Central Government On Lockdown: देशामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे नागरिक चिंतेत आले आहेत. पण खरंच देशात लॉकडाऊन लागणार का? याबाबत आता केंद्र सरकारने महत्वाची अपडेट दिली.

Priya More

Summary -

  • देशात लॉकडाऊन लागणार का? याबाबत केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

  • लॉकडाऊनबाबतच्या अफवा खोट्या आहेत

  • केंद्र सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण

  • नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

कोरोनानंतर भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे बोलले जात आहे. देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. या सर्व चर्चा आणि अफवांनंतर आता केंद्र सरकारने महत्वाची अपडेट दिली आहे. लॉकडाऊन लावण्याचा असा कोणताही प्लान नाही. देशात लॉकडाऊन लागणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना दिलासा मिळाला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी देशात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या केंद्र सरकारच्या अजेंड्यावर कोविड-१९ सारखी कोणतीही देशव्यापी लॉकडाऊन करण्याची योजना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणादरम्यान कोरोनाचा उल्लेख करण्यात आला त्यानंतर देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडियावर लॉकडाऊन लागणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्ट केले की, देशात कोविड-१९ सारख्या लॉकडाऊनची कोणतीही योजना नाही. केंद्र सरकार सध्या अशा कोणत्याही कृतीचा विचार करत नाही.' हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील यासंदर्भात भलीमोठी पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी हे स्पष्टपणे सांगतो की सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. अशावेळी आपण शांत, जबाबदार आणि एकजूट राहण्याची खूप गरज आहे.'

मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाले. पेट्रोल- डिझेल अन् एलपीसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी मिळणार नसल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यानंतर आला लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या. या अफवांनंतर मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आश्वासन दिले की, भारताची ऊर्जा परिस्थिती मजबूत आहे. इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होणार नाही यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना इंधन, ऊर्जा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. आम्ही पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT