Constitution Day SaamTv
देश विदेश

Constitution Day : संविधान दिवस कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या

Indian Constitution Detail Information News : लोकशाही असलेल्या देशात संविधानाची गरज ओळखून भारताने स्वातंत्र्यानंतर संविधान स्वीकारलं. पण हे संविधान कसं तयार झालं? ते तयार करताना त्यामागचा नेमका हेतू काय होता? आपण संविधान दिवस का साजरा करतो? संविधानाबद्दलच्या अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला आजही नाही.

Saam Tv

आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची जाणीव करून देण्यासाठी आणि संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दरवर्षी संविधान दिवस साजरा केला जातो. पहिला संविधान दिवस कधी साजरा झाला ते जाणून घेऊया. 

लोकशाही राष्ट्रासाठी, राज्यघटना देशातील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य ठरवत असते. संविधानाची गरज ओळखून भारतानेही स्वातंत्र्यानंतर संविधान स्वीकारले. राज्यघटना बनवण्यासाठी अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला गेला आणि त्यातून चांगले नियम व कायदे काढून भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.

संविधान दिवस म्हणून २६ नोव्हेंबराच का?

२६ नोव्हेंबर रोजी संविधानाची अनधिकृतपणे अंमलबजावणी करण्यात आली कारण त्या दिवशी संविधान निर्माण समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सर हरिसिंग गौर यांचा वाढदिवस आहे. २०१५ पासून प्रथमच संविधान दिवस साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

संविधान दिवस साजरा करण्याचं कारण काय?

२०१५ हे वर्ष राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांची १२५ वी जयंती होती.  आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी यावर्षी संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय  सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने घेतला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश संविधानाचे महत्व आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करणे हा आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेची गरज भासू लागली. तेव्हा राज्यघटना तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. २६ जानेवारी १९४९ रोजी भारतीय राज्यघटना तयार झाली. अधिकृतपणे २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाली. 

संविधान कोणी तयार केलं?

भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचे श्रेय डॉ. भीमराव आंबेडकर यांना जाते. बाबासाहेब संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक देखील म्हटले जाते. संविधान सभेचे ३८९ सदस्य होते आणि डॉ. राजेंद्र प्रसाद तिचे अध्यक्ष होते. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून भारताच्या संविधानाची ओळख आहे. 25 भाग असलेल्या या संविधानात ४४८ लेख, १२ वेळापत्रक आहेत. भारतीय राज्यघटना संघराज्य आणि एकात्मक दोन्ही आहे. मूलभूत अधिकारांसोबतच मूलभूत कर्तव्येही आपल्या राज्यघटनेत नमूद केलेली आहेत.

Edited by - अर्चना चव्हाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT