देश विदेश

Jharkhand Assembly : काँग्रेसकडून जाती-जातीचं राजकारण; झारखंडमध्येही मोदींनी दिला 'एक है तो सेफ है' चा नारा

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार करत आहेत. रविवारी झारखंड येथील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है चा नारा दिला.

Bharat Jadhav

काँग्रेस अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गातील लोकांना तोडत त्यांना छोट्या-छोट्या जातींमध्ये विभागत आहे. देशाला स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस समाजाचं विभागणी केल्याचा फायदा घेत आहे. राज्यात आणि केंद्रात त्याच्या आधारे सत्ता मिळवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील लोकांना एकोप्याने राहण्याचा सल्ला देत 'एक है तो सेफ है' चा नारा दिला. ते येथील एका प्रचार सभेत बोलत होते.

काँग्रेस नेहमी एससी , एसटी आणि ओबीसीच्या एकोप्याला विरोध राहिलीय. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हापर्यंत एससी, एसटी समाज आणि ओबीसी समाज विभक्त राहिला तेव्हा काँग्रेसने फोडा आणि राज्य करा या सिद्धांतावर केंद्रात सत्ता मिळवली. परंतु जेव्हा आपण एकजूट झालो तसं काँग्रेस बहुमताने कधीच केंद्रात सत्ता स्थापन करून शकली नाही. काँग्रेसचं हे गणित समजून घ्या म्हणत मोदींनी लोकांना राजकारणातील उदाहरण दिलं.

१९९० मध्ये ओबीसी समाजाला जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा इतर जाती यात जुडल्या. त्यानंतर काँग्रेस आतापर्यंत लोकसभेत २५० जागा जिंकू शकली नाही. त्याचमुळे काँग्रेस ओबीसी समाजाची ताकद तोडण्याचा प्रयत्न करत आहे. या जमातीली इतर जातींना विभागण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला

बोकारो आणि धनबादसह उत्तर छोटा नागपुरात राहणाऱ्या लोकांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, या प्रदेशात १२५ हून अधिक ओबीसी जाती आहेत.आज त्या सर्व ओबीसी म्हणून ओळखल्या जातात. हीच त्यांची ओळख आणि ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. यादव, कुर्मी महतो, तेली, कोरी, कुशवाह, नोनिया, बिंद, राजभर आणि प्रजापती कुम्हार यांच्यासह इतर ओबीसी जातींचा उल्लेख करताना म्हणाले की त्यांची एकजूट देशाच्या विकासासाठी मोठी ताकद आहे परंतु काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) त्यांना आपापसात वाटून घेण्याचा प्रयत्न करताहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, समाजात विभागणी व्हावी असं कोणालाच वाटत नाहीये. त्यामुळे एक रहेंगे तो सेफ रहेंगे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीर विधानसभेत पास करण्यात आलेल्या ३७० वापस लागू करण्यावरून काँग्रेसवर टीका केली. जगातील कोणतीच ताकद जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करू शकत नाही. रोटी, माती, आणि बेटी साठी झारखंडमध्ये एनडीएची सरकार बनली पाहिजे, असंही पंतप्रधान म्हणाले. बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा असं आवाहन सुद्धा पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT