‘Jana Gana Mana’ and ‘Vande Mataram’ represent India’s pride, history and national identity. saam tv
देश विदेश

Jana Gana Mana vs Vande Mataram: राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यातील फरक काय? दोन्ही गीत गाण्याचे नियम काय?

Difference Between National Anthem And National Song: "जन गण मन" हे राष्ट्रगीत आणि "वंदे मातरम" हे राष्ट्रीय गीत आहे, पण यांच्यातील फरकाबद्दल अनेकांना माहिती नाहीये. जर तुम्ही त्यापैकी एक असाल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

Bharat Jadhav

  • जन गण मन’ हे भारताचे अधिकृत राष्ट्रगीत आहे.

  • ‘वंदे मातरम’ हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे.

  • राष्ट्रगीत गाताना उभं राहणं बंधनकारक असतं.

बहुतेक लोक राष्ट्रगीत (National Anthem) आणि राष्ट्रीय गीत (National Song) यात गोंधळून जातात. त्यांना दोघांमधील स्पष्ट फरक माहित नसतो. जर तुमचाही त्यात काही गोंधळ उडत असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 'जन गण मन' या राष्ट्रगीत आणि 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीतामधील फरक काय आहे ते सोप्या भाषेत जाणून घेऊ.

राष्ट्रगीत (जन गण मन) आणि राष्ट्रीय गीत (वंदे मातरम) यांच्यातील मुख्य फरक हा आहे की राष्ट्रगीत घटनात्मकदृष्ट्या मान्यताप्राप्त आहे आणि काही औपचारिक प्रसंगी ते गाण्यासाठी कठोर नियम आहेत. राष्ट्रीय गीतासाठी असे कोणतेही कठोर नियम नाहीत.

(संवैधानिक) घटनात्मक दर्जा

राष्ट्रगीत हे राष्ट्राचे औपचारिक आणि संवैधानिक प्रतीक आहे. जे राष्ट्रीय एकता आणि सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करते. ते विशेष प्रसंगी आणि विशिष्ट प्रोटोकॉलसह गायले जाते. उदाहरणार्थ जसे की राष्ट्रगीत ५२ सेकंदांच्या कालावधीत पूर्ण करावे लागते. त्याच वेळी, राष्ट्रगीताच्या वेळी प्रत्येकाने लक्ष केंद्रित करून उभे राहिले पाहिजे.

तर राष्ट्रीय गीत हे भारताच्या स्वातंत्र्य आणि वैभवाची गाथा सांगणारे आहे. जी त्याच्या सांस्कृतिक वारशाचे आणि ऐतिहासिक संघर्षांचे प्रतीक आहे. हे औपचारिक नियमांशिवाय भावनिकरित्या गायले जाते. राष्ट्रगीताला संवैधानिक दर्जा आहे पण भारताचे राष्ट्रीय गीत, "वंदे मातरम्", याला संविधानात स्पष्ट संवैधानिक दर्जा नाहीये. मात्र त्याला राष्ट्रगीताइतकाच आदर दिला जातो.

राष्ट्रगीत म्हणून स्विकारले

'जन गण मन' हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी ११ डिसेंबर १९११ रोजी बंगाली भाषेत लिहिले होते. तर २७ डिसेंबर १९११ रोजी कोलकाता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा गायले गेले. तर त्याच वेळी, संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी ते भारताचे राष्ट्र गीत म्हणून स्वीकारले.

'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीत म्हणून स्विकारले

'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत १८७० च्या दशकात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी संस्कृत आणि बंगाली मिश्र भाषेत लिहिले होते. १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे प्रथम गायले होते. त्याच वेळी, २४ जानेवारी १९५० रोजी भारताच्या संविधान सभेने वंदे मातरम् ला देशाचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

SCROLL FOR NEXT