बांगलादेशातून भारतात घुसखोरी, ओळख लपविण्याकरिता भारतीय महिलेशी लग्न Saam Tv
देश विदेश

बांगलादेशातून भारतात घुसखोरी, ओळख लपविण्याकरिता भारतीय महिलेशी लग्न

या काळात इस्लामिक स्टेट ही अतिरेकी संघटना भारतात आपले जाळे वाढवत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोलकाता : देशासह जगावर मागील दीड वर्षापासून कोरोनाचे Corona सावट आहे. या संकट काळामध्ये जगभरात लाखो लोकांचा मृत्यू Death झाला आहे. भारतामध्ये देखील कोरोना प्रचंड फोफावला माजला आहे. या काळात केंद्र सरकार Central Government आणि विविध राज्य सरकारकडून संसर्ग कमी करण्याकरिता लॉकडाऊन Lockdown लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरी राहणे यावेळी पसंत केले आहे.

पण या काळात इस्लामिक स्टेट ही अतिरेकी Terrorist संघटना भारतात India आपले जाळे वाढवत आहे, अशी माहिती आता समोर आलेली आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या बेरोजगारीचा फायदा घेऊन जेएमबी, अंसारुल्लाह गुट आणि आयएस IS या अतिरेकी संघटना देशामधील तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.

हे देखील पहा-

कोलकाता Kolkata पोलिसांनी Police काही दिवसांअगोदर दक्षिण किनाऱ्यावर हरिदेबपूर Haridebpur येथील ३ संशयितांना बेड्या ठोकले आहेत. पुढे चौकशी केली असता, ते जेएमबी या अतिरेकी संघटनांचे संचालक असल्याची माहिती मिळाली आली. या अतिरेक्यांची नजीउर रहमान पावेल, मेकैल खान आणि रबीउल इस्लाम अशी अटक करण्यात आल्याची नावे आहे. या ३ अतिरेक्यांनी योग्य संधी साधत बांगलादेश Bangladesh मधून भारतात घुसखोरी केली होती.

विशेष म्हणजे ते कोलकात्यामधील एका हायप्रोफाईल भागात राहत असत, अशी माहिती त्यांच्या चौकशी मधून समोर आली आहे. भारतात घुसरखोरी करुन हायप्रोफाईल परिसरात राहणारे अतिरेकी हे देशामधील बेरोजगार तरुण- तरुणांना हेरत आहेत. ते त्यांचे ब्रेनवॉश करायचे. विशेष म्हणजे ते प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन चॅट करुन तरुण- तरुणींचे ब्रेनवॉश करत आहेत. यानंतर ते या तरुणांची अतिरेकी संघटनेत भरती करत आहेत.

या गोष्टीवर अधिकाऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे इस्लामिक स्टेट ही संघटना भारतात जाळे वाढवण्याकरिता सर्वोतोपरी कट आखत आहेत. या संघटनेने भारतामधील १२ राज्यात तरुणांना आपल्याकडे आकर्षित केल्याचा दावा करण्यात येत आहे. या संघटनेचे लष्कर- ए- तोयबा आणि अल- कायदा सारख्या संघटनांशी याचा संबंध आहे. भारतात आपली विचारधारा पसरविण्यासाठी या अतिरेकी संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड वापर करत आहे.

भारतात घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना आपली ओळख लपविण्यासाठी लग्न हे सोपे माध्यम आहे. या माध्यमामधून त्यांना भारताचा नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोठी मदत होत आहे. तसेच स्थानिक पातळीवर रुळण्यास देखील मदत होते. यामुळे लग्न हे त्यांचे एकप्रकारे सुरक्षा कवच बनतं आहे. आरोपी इतके हुशार असतात की ते आपली ओळख लपवण्याकरिता धर्म परिवर्तनही करत आहेत.

कोलकाता पोलिसांनी पकडलेला अतिरेकी पावेल याने याच माध्यमातून आपली ओळख लपवलेली होती. त्याचे जयराम बेपारी असे हिंदू नाव आहे. त्याने आणि त्याचा सहकारी मेकैल खान उर्फ शेख शब्बीर यांनी हरिदेवपूर भागात २ महिलांसोबत मैत्री केली होती. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर पुढच्या महिन्यात लग्नाची योजना बनवलेली होती.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT