Explainer Saam Digital
देश विदेश

Explainer : मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचीच निवड का?, अरविंद केजरीवाल यांचा काय आहे मास्टर प्लान? वाचा सविस्तर

Atishi Marlena : अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी मार्लेना सिंह यांची निवड करण्यात आली आहे. पठीण काळात त्यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Sandeep Gawade

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत संपूर्ण देशाला धक्का दिला. त्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू असताना दिल्ली सरकारमधील एकमेव महिला मंत्री आतिशी मार्लेना सिंह यांची मंगळवारी आपच्या आमदारांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. काळकाजी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असलेल्या आतिशी यांच्याकडे आप सरकारमधील सर्वाधिक खात्यांची जबाबदारी आहे. आता त्या मुख्यमंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारतील. ११ वर्षांनंतर दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे.

कोण कोण होतं चर्चेत?

अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर अनेक आप नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यांमध्ये मंत्री आतिशी, गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावांचा समावेश होता. मात्र आतिशी या पदासाठी आघाडीवर होत्या कारण केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या मद्य धोरण प्रकरणातील अटकेनंतर त्यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर पक्षासाठी महत्त्वाची भूमिका

२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. मनीष सिसोदिया सुद्धा तुरुंगात होते. त्यामुळे पक्षात आणि सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कोणताही नेता शिल्लक नव्हता. सौरभ भारद्वाज यांच्यासह लोकसभा निवडणुकीवेळी सरकारच्या बाजूने प्रचार केला. या काळात त्या माध्यमांमध्ये आणि जनतेतीही दिसू लागल्या होत्या. जून महिन्यात हरियाणा सरकारने १०० दशलक्ष गॅलन प्रतिदिन पाणी न सोडल्यामुळे राजधानीत निर्माण झालेल्या पाणी संकटाविरोधात त्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलं होतं. यावेळी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखलं करावं लागलं होतं. केजरीवाल यांच्या अटकेपासूनच आतिशी मुख्यमंत्री पदाच्या दावेदार मानल्या जात होत्या किंवा तुरुंगातून सरकार चालवण्याचा पर्याय होता.

तब्बल १४ खात्यांची जबाबदारी

गेल्या वर्षी ९ मार्च रोजी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. त्यावळे भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कित्येक महिने ते तिहार जेलमध्ये होते. याचदरम्यान आतिशी यांचं दिल्लीच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान निर्माण झालं होतं. भारद्वाज यांना आरोग्य, नागरी विकास, पाणी आणि उद्योग विभागांची जबाबदारी देण्यात आली, तर आतिशी यांच्याकडे तब्बल १४ खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामध्ये शिक्षण, अर्थ, योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पाणी, वीज आणि जनसंपर्क या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश महत्त्वाचे विभाग आहेत.

शिक्षण क्षेत्रातील भूमिका

केजरीवाल सरकारची जगाने दखल घेतली ती म्हणजे दिल्लीतील शिक्षणक्षेत्रात केलेल्या अमूलाग्र बदलांची. यूनेस्कोनेही याची दखल घेतली. त्या शिक्षण खात्याची जबाबदारी आतिशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांची पक्षातील प्रतिष्ठाही वाढली. त्या मनीष सिसोदिया यांच्या सल्लागारही राहिल्या आहेत. ज्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र आणखी बळकट झालं.

सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम करताना, ‘हॅपिनेस करिक्युलम’ आणि ‘आंत्रप्रेन्योरशिप माइंडसेट करिक्युलम’ हे अभ्यासक्रम दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये सुरू करण्यात आले. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या भावनिक स्वास्थ्यावर आणि कौशल्य विकास व्हावा हा होता.

ऑक्सफर्ड ते छोट्याशा गावात ७ वर्ष

रोड्स स्कॉलर असलेल्या आतिशी या आम आदमी पक्षाच्या सर्वात सुशिक्षित सदस्यांपैकी एक आहेत. ज्यामुळे पक्षाच्या शहरी, मध्यमवर्गीय मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळतो. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. आम आदमी पक्षासोबत येण्यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात सात वर्षे घालवली. जिथे त्यांनी सेंद्रिय शेती आणि प्रगत शिक्षण प्रणालींवर अभ्यास केला. त्यांनी तिथल्या अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत काम केलं, जिथे त्यांची AAP च्या सदस्यांशी पहिल्यांदा भेट झाली. AAP च्या स्थापनेवेळी त्या पक्षात सामील झाल्या. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या मुख्य सदस्यांपैकी त्या एक होत्या. पुढे त्यांनी पक्षाच्या धोरणांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT