Explainer Saam Digital
देश विदेश

Explainer : मुख्यमंत्रिपदाचे ७ नेते दावेदार, तरीही आतिशी यांचीच निवड का? वाचा सविस्तर

Sandeep Gawade

मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर लगेचचं केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा करत संपूर्ण देशाला धक्का दिला. त्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू असताना दिल्ली सरकारमधील महिला मंत्री आतिशी मार्लेना सिंह यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आता त्या मुख्यमंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारतील. ११ वर्षांनंतर दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे. तरीही मुख्यमंत्रिपदाचे ७ नेते दावेदार असताना आतिशी यांचीच निवड का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोण कोण होते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एकूण ७ नावं समोर आली होती. यामध्ये पहिलं नाव त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचं होतं. मात्र, आमदार नसल्यामुळे त्यांच्या दावेदारीची शक्यता सुरुवातीपासूनच कमी होती. याशिवाय मंत्री गोपाल राय, कैलाश गहलोत, आतिशी, सौरभ भारद्वाज, राखी बिडलान आणि कुलदीप कुमार हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. सौरभ भारद्वाज यांनी तर आपल्या दावेदारीबाबत मीडियाशी उघडपणे बोलले होते.

पडत्या काळात पक्षासाठी महत्त्वाची भूमिका

मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना मद्य घोटाळा प्रकरणात अटक झाली होती. पक्षात आणि सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कोणताही नेता शिल्लक नव्हता. या कठीण काळात आतिशी यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाय सौरभ भारद्वाज यांच्यासह लोकसभा निवडणुकीवेळी सरकारच्या बाजूने प्रचार केला. हरियाणा सरकारने जून महिन्यात १०० दशलक्ष गॅलन प्रतिदिन पाणी न सोडल्यामुळे राजधानीत निर्माण झालेल्या पाणी संकटाविरोधात त्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलं होतं. यावेळी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात देखील दाखलं करावं लागलं होतं.

महत्त्वाच्या शिक्षण खात्याची जबाबदाही

महत्त्वाच्या शिक्षण खात्यासह तब्बत १४ खात्यांची जबाबदारी आतिशी यांच्याकडे होती. गेल्या वर्षी ९ मार्च रोजी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. केजरीवाल सरकारने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची यूनेस्कोनेही दखल घेतली होती. याच खात्याची जबाबदारी आतिशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांची आम आदमी पक्षातील प्रतिष्ठाही वाढली आहे.

मनीष सिसोदिया यांच्या निकडवर्तीय

आतिश मनीष सिसोदिया निकटवर्तीय राहिल्या आहेत. यांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांचं भावनिक स्वास्थ आणि कौशल्य विकास व्हावा यासाठी ‘हॅपिनेस करिक्युलम’ आणि ‘आंत्रप्रेन्योरशिप माइंडसेट करिक्युलम’ हे अभ्यासक्रम सरकारी शाळांमध्ये सुरू करण्यात आले. २०११ भ्रष्टाचार विरोधी आंदोनादरम्यान आतिशी यांचा आपच्या AAP च्या सदस्यांशी पहिल्यांदा भेट झाली. तिथून पुढे त्या आंदोलनात सहभागी झाल्या आणि पुढे पक्षाचं कामही करू लागल्या. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. पक्षात त्यांच्या इतका उच्च शिक्षित नेता नाही. त्यामुळे पडत्या काळात आतिशी यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान आणि त्यांचा अनुभव, सामाजिक कार्यामुळे त्यांना संधी देण्यात आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT