विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता सरकारला संसदेत घेरलंय. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळीच याची झलक पाहायला मिळाली. लोकसभेत काँग्रेसह विरोधी पक्षांच्या खासदारांनी थेट काळे कपडे परिधान करून दिल्लीतल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर कामकाज सुरू होताच शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली. तर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात सभागृहात लोकसभा अध्यक्षांनाच खडेबोल सुनावले... संसदेच्या बाहेर बोलणारे पंतप्रधान संसदेत प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत? असा सवालही यादव यांनी केला...
तर राज्यसभेत केंद्रीयमंत्री जे पी नड्डा यांनी चर्चेची तयारी दर्शवली. मात्र धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा न करण्याची ठाम भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतल्यामुळे वारंवार कामकाज स्थगित करावं लागलं.
सरकार चर्चेची भाषा करतय. तर विरोधक राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे संसदेत मोठी कोंडी निर्माण झालीय. तीन दिवसांपासून सुरू असलेला हा तिढा आता सरकार नेमका कसा सोडवणार याबाबत प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे चौथ्या दिवशी तरी केंद्र सरकार यावर ठोस तोडगा काढणार की असाच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगत राहणार याकडे देशाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.