अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा, न्यायालयाचे जामीन केला मंजूर
Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal Got Bail: अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा, न्यायालयाचे जामीन केला मंजूर

Satish Kengar

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांना गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा दिलासा दिला. याआधी सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ते पुन्हा तिहार तुरुंगात गेले होते. त्यांनी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आज त्यांना दिलासा मिळाला आहे.

ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांच्या कोर्टाने त्यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी जामीनपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी ४८ तासांचा अवधी द्यावा, अशी विनंती ईडीने ट्रायल कोर्टाला केली. मात्र या आदेशाला स्थगिती दिली जाणार नसल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले आहे.

ट्रायल कोर्टाने सांगितले की, जामीनपत्र उद्या न्यायाधीशांसमोर सादर केला जाईल. केजरीवाल शुक्रवारी तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. केजरीवाल यांच्या सुटकेआधी ईडी दिल्ली हाय कोर्टात जाऊन ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती मागू शकते, असं बोललं जात आहे. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.

सलग दोन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने गुरुवारी न्यायालयात दावा केला होता की, दारू घोटाळ्यात वापरलेल्या पैशाचे फोटो जप्त करण्यात आले आहे.

केजरीवाल यांनी 100 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा दावा ईडीने केला होता. तर केजरीवाल यांच्यावतीने उपस्थित असलेल्या वकिलाने म्हटले होते की, संपूर्ण प्रकरण केवळ सरकारी साक्षीदारांच्या जबाबावर आधारित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT