देश विदेश

Bihar Politics: बिहारमध्ये कसा होणार सत्ता बदलाचा खेळ? कसा साधला जाणार सत्तेच्या आकड्याचा नंबर

Bihar Politics : नितीश कुमार महाआघाडी सरकारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन २८ जानेवारी रोजी एनडीए सरकारमध्ये सामील होणार आहेत. २९ तारखेनंतर मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. दरम्यान बिहारमध्ये सत्तेसाठी आकड्याचा खेळ कसा साधला जाणार हे आपण समजून घेऊ..

Bharat Jadhav

Bihar Politics Number Game:

बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. जनता द युनायटेड(जेडीयू) भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू झालीय. दोन्ही पक्षात सर्व बाबींवर चर्चा झाली असून फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याचं म्हटलं जात आहे. नितीश कुमार महाआघाडी सरकारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन २८ जानेवारी रोजी एनडीए सरकारमध्ये सामील होणार आहेत. २९ तारखेनंतर मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. दरम्यान बिहारमध्ये सत्तेसाठी आकड्याचा खेळ कसा साधला जाणार हे आपण समजून घेऊ.. (Latest News)

बिहारची राजधानी पाटण्यात राजकीय वातावरण तापलं असून बैठकांचं सत्र सुरू झालंय. जेडीयूने आपल्या सर्व आमदारांना तात्काळ पाटण्याला पोहोचण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (आरजेजेडी) देखील सक्रिय मोडमध्ये आले आहे. आरजेडीने राबडी देवी यांच्या निवासस्थानी आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. नितीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतरही सरकार कसं वाचवण्यात येईल, अशा संभाव्य पर्यायांवर विचारमंथनही या बैठकीत केले जात आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सत्ता राखण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी हिंदुस्थानी अवाम मोर्चाशी चर्चा केलीय. हम पार्टीचे अध्यक्ष जीतन राम मांझी हे एकेकाळी महाआघाडीचा भाग होते. मिळालेल्या माहितीनुसार, लालूंनी मांझी यांना त्यांचा मुलगा संतोष मांझी यांना उपमुख्यमंत्री करण्याची ऑफरही दिलीय. दरम्यान संतोष मांझी यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. आण एनडीएसोबत आहोत, आणि एनडीएसोबतच राहणार असल्याचं म्हटलं आहे.

असा आहे आकड्याचा खेळ

बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी १२२ आमदारांचे बहुमत आवश्यक असते. लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडी (RJD)७९ सदस्यांसह बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. तर भाजप ७८ आमदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही पक्षांकडे बहुमत नाहीये. नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आघाडीतून बाहेर पडले तर काँग्रेसकडे १९, तर डाव्या पक्षाकडे १६ आमदार आहेत.

RJD,काँग्रेस आणि डाव्यांच्या आमदारांची संख्या जोडली तर एकूण सदस्य संख्या ११४ वर पोहोचते. यामुळे बहुमतासाठी ८ अंक कमी आहेत. भाजपकडे ७८ आमदार आहेत. जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हम पक्षाचे चार आमदार आहेत. नितीशकुमार यांच्याकडे आमदारांची संख्या ८२ वर पोहोचते. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षातही एक आमदार आहे जो एनडीएमध्ये किंवा महाआघाडीतही नाही.

एनडीए असो वा महाआघाडी, नितीश कुमार यांचा पक्ष कुठलाही मार्ग पत्करला तरी सहज सरकार स्थापन होईल आणि वाचवता येईल. पण आता प्रश्न असा आहे की विधानसभेच्या आकड्यांच्या खेळात नितीश यांनी एनडीएची बाजू घेतल्यानंतरही आरजेडीला सरकार स्थापनेची आशा का आणि कशी आहे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Cancer Risk: कारण नसताना पाठ, छाती किंवा डोकं दुखतंय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Gold Rate Today: दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोनं ₹१२०० रुपयांनी महागलं, वाचा २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

Kalyan : कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा विळखा; नो-एंट्री आदेशानंतरही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT