Amit Shah Rally In West Bengal SAAM TV
देश विदेश

Amit Shah Rally : 2025 पूर्वीच देशातील आणखी एक सरकार कोसळणार; अमित शहांनी दिले संकेत

Amit Shah Rally In West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी बीरभूम जिल्ह्यातील सिऊडी येथील सभेत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Nandkumar Joshi

Amit Shah Rally In West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी बीरभूम जिल्ह्यातील सिऊडी येथील सभेत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सन २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. सन २०२४ मध्ये भाजपला लोकसभेच्या ३५ हून अधिक जागा जिंकून द्या, तर २०२५ पर्यंत ममता बॅनर्जी यांचे सरकार कोसळणार, असेही ते म्हणाले. (Latest News Update)

यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला. 'दीदीं'च्या सत्ताकाळात बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले आहे. भाजपचे सरकार येऊ द्या, मग पुन्हा कधीच रामनवमीला हिंसाचाराच्या घटना घडणार नाहीत, असेही शहा म्हणाले.

दरम्यान, अमित शहा हे रामनवमीला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी बीरभूममध्ये भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन केले.

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. बंगालच्या जनतेला नव्या वर्षाच्या आधीच शुभेच्छा देत आहे.

यावेळी अमित शहा म्हणाले की, 'देशात पहिल्यांदाच आदिवासी महिलेला राष्ट्रपती करण्याचे काम आमच्या नरेंद्र मोदी यांनी केले. विधानसभा निवडणुकीत बंगालच्या जनतेने ७७ जागा दिल्या आहेत. भाजपसाठी ही मोठी जबाबदारी आहे. बंगाल विधानसभेत दीदींच्या दादागिरीविरोधात लढण्याचे काम आमदार करत आहेत.'

दीदी-भाच्याला हटवा आणि भाजपला आणा - शहा

दीदी आणि भाच्याला पराभूत करूनच बंगालला वाचवू शकतो. आयुषमान भारत योजना सुरू व्हावी, असे ममतांना अजिबात वाटत नाही. एकदा बंगालमध्ये भाजपचं सरकार येऊ द्या, ८ कोटी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत सुविधा देऊ, असे आश्वासनही शहा यांनी यावेळी दिले.

देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर पुन्हा मोदींना पंतप्रधान करा!

अमित शहा म्हणाले की, पाकिस्तानला सडेतोड उत्तर ममता दीदी देऊ शकतात का? काश्मीरमधून दहशतवाद केवळ मोदीच हद्दपार करू शकतात. अयोध्येत राम मंदिर व्हायला हवे, ममता बॅनर्जी, काँग्रेस, कम्युनिस्ट अडथळे आणत होते. मोदीजींनी अयोध्येत मंदिर उभारलं. देशाला सुरक्षित ठेवायचे असेल आणि समृद्ध करायचे असेल तर मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'लाइफ इन अ मेट्रो'चा रेकॉर्ड ब्रेक, वाचा संडे कलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Shoe Bite Remedy: नवीन बूट घातल्यानंतर पायाला चावतात का? 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT