Crime: मुलाच्या हव्यासापोटी २४ तासात दोन नवजात मुलींची हत्या Saam Tv
देश विदेश

Crime: मुलाच्या हव्यासापोटी २४ तासात दोन नवजात मुलींची हत्या

पश्‍चिम बंगालमध्ये मागील २४ तासात मुलाच्या हव्यासापोटी अशा २ नवजात मुलींची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : मुली त्यांच्या प्रतिभा आणि कर्तृत्वाने गगनाला स्पर्श करत आहेत. पण तरीही समाजामध्ये अशा लोकांची कमतरता नाही, जे मुलाची इच्छा कायम ठेवतात आणि आपली इच्छा पूर्ण करण्याकरिता गुन्हे करत असतात. पश्‍चिम बंगालमध्ये मागील २४ तासात मुलाच्या हव्यासापोटी अशा २ नवजात मुलींची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पहिली घटना कोलकाता महानगरातील इक्बालपूर या ठिकाणी घडली आहे, तर दुसरी घटना बांकुरा जिल्ह्यामधील छतना पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.

मागील २४ तासांत २ नवजात बाळांची हत्या झाल्यामुले पश्चिम बंगालचे सज्जन समजल्या जाणाऱ्या बंगाली समाजामधील लोकांमध्ये अस्वस्थता आहे. बुद्धिजीवी आणि समाजशास्त्रज्ञ या हत्यांवर सतत टीका करत आहेत आणि नवनिर्मितीचा अग्रदूत मानले जाणारे बंगालच्या लोकांनी हा क्रूरतेचा मार्ग कसा स्वीकारला आहे, असा सवाल उठवला जात आहे.

हे देखील पहा-

आईनेच एका दिवसाच्या नवजात मुलीला उशीने दाबून हत्या केली

महानगरातील इक्बालपूर पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी एका जन्मदात्या आईने उशीने तोंड दाबून तिच्या एक दिवसाच्या नवजात अर्भकाची हत्या केली आहे. मंगळवारी सकाळी ६.२० वाजता मुलीचा जन्म झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लवली सिंह (वय-२१) इक्बालपूर लेन येथील नेताजी सुभाष नर्सिंग होम आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे लवलीने मंगळवारी सकाळी मुलीला जन्म दिला होता. कर्तव्य बजावत असलेल्या परिचारिकांचे म्हणणे आहे, की मुलीच्या जन्माबाबत ऐकल्यावर लवली ही दु:खी झाली होती. तिचा पती अजय सिंह तिच्याबरोबर होता.

बुधवारी सकाळी जेव्हा ती साडेपाच सहा वाजेच्या दरम्यान ड्युटी करत असलेल्या मुलीला भेटायला गेली होती, तेव्हा तिला ती मृतावस्थेत आढळली आहे. त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला कळवले आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आहे. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली आणि सांगितले की तिच्या नाकावर दाबण्याच्या खुणा आहेत. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, तो सकाळी केबिन मधून चहा घेण्याकरिता बाहेर आला होता. मुलीच्या आईची बराच वेळ विचारपूस करण्यात आली होती. ज्यामध्ये तिने कबूल केलेले आहे की दुपारी १२.३० नंतर त्याने तिचा चेहरा उशीने दाबून तिची हत्या केली आहे.

16 दिवसाच्या मुलीला वडिलांनी पुरले

दुसरीकडे, धक्कादायक घटना बांकुराच्या छतना पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. वडिलांना मुलगा हवा होता, पण सलग २ मुली झाले होते. त्यामुळे वडिलांनी आपल्या १६ दिवसांच्या मुलीची हत्या केल्यावर तिला भातशेतात पुरले आहे. बुधवारी कोजागरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका १६ दिवसांच्या मुलीचा मृतदेह भात शेतातून सापडला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीनाथ सोरेन सलग २ मुलींच्या जन्मामुळे आनंदी नव्हते.

दरम्यान, अचानक १ मुलगी गायब झाली. मूल सापडले नाही, तेव्हा आईला संशय उभा राहिला. आईने पोलिसांकडे तक्रार केली की, त्याच्या तक्रारीच्या आधारावर छतना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर भातशेतातून मुलीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या वडिलांनी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह भात शेतात लपवून ठेवल्याचे समजत आहे. मृतदेह जप्त करुन पोलिसांनी अश्विनीनाथ सोरेनला अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT