'स्वातंत्र्याचे विधान जर मुस्लिमाने केले असते तर त्याचा Encounter केला असता' Twitter/ @AIMIM
देश विदेश

'स्वातंत्र्याचे विधान जर मुस्लिमाने केले असते तर त्याचा Encounter केला असता'

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानावरुन निशाणा साधला आहे.

वृत्तसंस्था

अलिगढ: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत वर तिच्या वादग्रस्त विधानावरुन निशाणा साधला आहे. ते उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे प्रचार सभेला संबोधित करत होते. 1947 मध्ये भारताला जे मिळाले ते 'भीक' होतं आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2014 मध्ये देशाला खरी स्वातंत्र्य मिळाले, असे कंगना म्हणाली होती.

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ''एक मोहतरमा म्हणाल्या की देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, जर एखाद्या मुस्लिमाने चुकून असे म्हटले असते तर त्याच्यावर UAPA लावला असता. तुरुंगात टाकण्यापूर्वी त्याला पोलीस ठाण्यात नेऊन गुडघ्यावर गोळ्या घातल्या असत्या, तुम्हाला देशद्रोही ठरवले असते. पण, ती राणी आहेस आणि तूम्ही महाराज आहात, म्हणूनच कोणी काही करत नाही, तूम्ही का करत नाही? भारत-पाकिस्तान मॅचमध्ये चुकून कोणी काही लिहिलं, तर बाबा म्हणाले त्याला तुरुंगात पाठवा. गद्दारी चा आरोप लावला आणि त्याला जेलमध्ये पाठवले''.

ते पुढे म्हणाले, 'मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांना विचारतो की, देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला की 2014 मध्ये… आणि जर हे चुकीचे असेल, तर देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देशद्रोहाचा आरोप लावणार? देशद्रोह फक्त मुस्लिमांसाठी आहे का? यापेक्षाही हे संविधानाच्या विरोधात आहे. पंतप्रधान गप्प का? या वक्तव्यानंतर भाजपाकडून प्रतिक्रिया आली की या विधानावर आमचा विश्वास नाही… विश्वास नाही तर मग आम्ही बोलतो तर मग आमच्यावरच खटला कशाला, तुमच्या बोलण्यावर आमचा विश्वास नाही, हेही सांगा''.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

उमेदवारांनो सावध राहा! खबरदारीने निर्णय घ्यावे लागेल; ५ राशींचे लोकांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुकीत PADU मशिन, आयोगाच्या नव्या मशीनवर ठाकरेंचा आक्षेप, PADU मशीन नेमकं कशासाठी?

Haldi Kumkum affordable gift: स्वस्तात मस्त...अगदी १० रूपयांपासून हळदी-कुंकुच्या वाणामध्ये देऊ शकता या गोष्टी

SCROLL FOR NEXT