S Jaishankar on Bangladesh Crisis Saam Tv
देश विदेश

Bangladesh Crisis: हिंसाचार आणि जाळपोळ, बांगलादेशात अडकले 19000 भारतीय, नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय आहे सरकारचा प्लॅन?

S Jaishankar on Bangladesh Crisis: शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवं सरकार स्थापन होणार आहे. मात्र अजूनही हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. बांगलादेशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर भारत सतत लक्ष ठेवून आहे.

Satish Kengar

बांगलादेशात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवं सरकार स्थापन होणार आहे. मात्र अजूनही हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. बांगलादेशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर भारत सतत लक्ष ठेवून आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, सरकार बांगलादेशातील राजकीय घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे. जोपर्यंत तेथील कायदा आणि सुव्यवस्था सामान्य होत नाही तोपर्यंत भारताची चिंता कायम राहील. ते म्हणाले की, ''19 हजार भारतीय नागरिक अजूनही बांगलादेशमध्ये अडकले आहेत, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी आहेत. आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत.''

बांगलादेशातील घडामोडींवर राज्यसभेत बोलताना जयशंकर म्हणाले की, शेजारील देशातील राजकीय घडामोडी ही चिंतेची बाब आहे आणि सरकार आपल्या राजनैतिक मिशनद्वारे तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांशी संपर्क ठेवत आहे. ते म्हणाले की, तेथे 19 हजार भारतीय नागरिक आहेत, त्यापैकी सुमारे नऊ हजार विद्यार्थी आहेत आणि यापैकी बरेच विद्यार्थी जुलैमध्ये मायदेशी परतले होते.

परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, ''बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवरही भारत लक्ष ठेवून आहे. अनेक गट आणि संघटना अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी पावले उचलत असल्याच्या बातम्या येत आहेत.''

ते म्हणाले, तेथील कायदा व सुव्यवस्था सामान्य होईपर्यंत आमची चिंता कायम राहील. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, बांगलादेशातील गुंतागुंतीची परिस्थिती पाहता सीमेवर तैनात सुरक्षा दलांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले की, भारत गेल्या 24 तासांपासून ढाका येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT