water scarcity in dehu
water scarcity in dehu 
मुंबई/पुणे

प्रशासनाचे दुर्लक्ष; देहूत पाणी टंचाई, वारकऱ्यांच्या घशाला कोरड

दिलीप कांबळे

देहूनगरी : तब्बल दोन वर्षानंतर देहूनगरीत वारकऱ्यांची मांदियाळी आहे. आळंदी मधील माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यातून अनेक वारकरी देहूनगरीत दाखल हाेऊ लागले आहेत .आळंदीत उद्या (मंगळवार, ता. ३०) ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी येत असतात. मात्र आळंदी येथे जाण्यापूर्वी सर्व वारकरी हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत येऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन पुढे आळंदीत जात असतात. त्यामुळे आता देहूनगरीत वारकऱ्यांची मांदियाळी बघायला मिळत आहे.

देहूनगरीत सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दिसून येत आहे. इंद्रायणी नदी असताना देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने वारकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत आले आहेत. मात्र पिण्याचे पाणी नसल्याने water scarcity in dehu वारकऱ्यांच्या घशाला कोरड पडल्याचे चित्र सध्या देहूत पहायला मिळत आहे.

देहूमधील सुहास गोलांडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि काही स्थानिक नागरिकांनी एकवटून आता फिल्टर पाण्याचे बूथ लावून पिण्याच्या पाण्याची सोय वारकऱ्यांसाठी केली आहे. त्यामुळे तहानलेल्या वारकऱ्यांची तहान यामुळे भागली जात आहे. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

SCROLL FOR NEXT