MVA Press Conference Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: गद्दारांसाठी पक्षाची दारे बंद! शिंदे, अजितदादांसाठी परतीचे दोर कापले; ठाकरे आणि पवारांची भूमिका

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा राजकीय संघर्ष होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्यानं मतदारांचा कौल कोणाकडे असणार याची उत्सुकता होती. गद्दार, निष्ठावंत हा मुद्दाही महत्वाचा होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

मविआला ३० जागा मिळाल्यानं विधानसभेसाठी आघाडीतील तीनही पक्ष एकजुटीनं पुढे सरसावले आहेत. शनिवारच्या मविआच्या संयुक्त पत्रकार परीषदेत त्याची प्रचिती आली. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का? या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजिबात घेणार नाही.

एकीकडे उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसाठी परतीची दारं बंद असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आम्ही दार उघडा असं सांगितलेलं नाही, असं प्रत्युत्तर दिलंय.

लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दहा उमेदवार उभे करुन आठ जागा जिंकल्यात. सर्वात जास्त स्ट्राईक रेट पवारांचा असताना अजित पवारांच्या वाट्याला केवळ एक विजय आलाय. पवारांनीही गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची व्यक्त केलेल्या या मतांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परतीचे दोर कापले गेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोर आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. मविआची वज्रमुठ आणि लोकसभेत मिळालेलं ताजं यश पाहता महायुतीसमोर मोठं आव्हान असणार आहे. आगामी विधानसभाही निष्ठा आणि गद्दार भोवती फिरणार असं चित्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

SCROLL FOR NEXT