आंदोलनाची यापुढची भूमिका कामगारांनी ठरवावी- सदाभाऊ खोत  Saam Tv
मुंबई/पुणे

आंदोलनाची यापुढची भूमिका कामगारांनी ठरवावी- सदाभाऊ खोत

आंदोलन कामगारांनी उभे केले आहे. यामुळे त्याविषयीचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हे आंदोलन कामगारांनी उभे केले आहे. यामुळे त्याविषयीचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. आज यशवंतराव चव्हाणांचा Yashwantrao Chavan स्मृतीदिन आहे. या दिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा. आझाद मैदानावरचे Azad Ground आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत. बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की तसेच ठेवायचे, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा, असे वक्तव्य आज पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे.

आंदोलन चालू ठेवले तर त्यांना पाठिंबा राहिलच, मात्र तो निर्णय त्यांनीच घ्यावा, असे मत सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला आहे. यावेळी ते म्हणाले आहेत की, मागील अनेक वर्षे या कामगारांची मागणी होती. वेळेत पगार आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावी मागणी होती. शासनाकडून डोळेझाक करण्यात आले आहे. त्यानंतर कामगारांनी संघटनाव्यतिरिक्त संपाची हाक डेन्ह्यात आली आहे. तुटपुंज्या पगारामध्ये घरखर्च, मुलांचे शिक्षण वगैरे गोष्टी भागत नव्हते.

हे देखील पहा-

सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून १६ दिवस त्यांच्याबरोबर आझाद मैदानामध्ये बसलो होतो. विलीनीकरण झाल्यानंतर आमचा प्रश्न सुटणार आहे, अशी कामगारांची भावना निर्माण झाली होती. याच भावनेतूनच संघटनेशिवाय कामगारांनी यावेळी संप पुकारला आहे. आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहिलो आहोत. पुढे ते म्हणाले की, सरकारने पगारवाढ करुन देखील तोपर्यंत दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगारांचं हे महत्वाचे यश आहे, असे मी समजतो. मूळ वेतनात ही वाढ झाली आहे. ही वाढ अनेकवर्षे झाले तरी देखील करण्यात आली नव्हती. कामगारांचा हा पहिल्या टप्प्यातला विजय आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या अगोदर पगार देण्याला सरकार बांधील राहणार आहे, अशी सरकारची भूमिका आहे. एका बाजूला विलीनीकरणाचा आमचा लढा सुरुच राहणार आहे. दुसऱ्या बाजूला सरकार २ पावले पुढे आले आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही दुसरा टप्प्यातला लढा देखील उभा करु. सर्व कामगारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. सरकारने कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे जे कामगार कामावर हजर राहणार आहेत, त्यांचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे, असे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांसह विमानात ५ जण होते की ६ जण..? शंकांचं काहूर सुरू असतानाच उज्ज्वल निकम यांनी नेमकं काय सांगितलं? VIDEO

Maharashtra Live News Update: अलिबागच्या आंबेपूर मतदार संघात शिवसेनेचे बॅनर फाडले

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?

Silver Price and Investment: चांदीच्या दरात १७,००० रुपयांची मोठी घसरण; दर आणखी पडण्याची शक्यता, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Saam TV Exclusive : अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न, तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT