Raj Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठाकरे गट अन् मनसे डोंबिवलीत एकत्र, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची नांदी?

Raj Uddhav Thackeray Alliance : पलावा पुलाचे काम गेले अनेक वर्ष रखडलेलं आहे. शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी पुलाच्या कामाची पाहणी करत लवकरच हा नागरिकांसाठी खुला केला जाईल, असं सांगितलं.

Prashant Patil

अभिजीत देशमुख, साम टिव्ही

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राज्यात राजकारणात उधाण आलं आहे. विशेष बाब म्हणजे, कल्याण-डोंबिवलीत याबाबतचं पहिला अनुभव पाहायला मिळाला, अशी चर्चा आता रंगली आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकत्र पलावा पुलाच्या कामाच्या पाहणीसाठी पोहोचले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

पलावा पुलाचे काम गेले अनेक वर्ष रखडलेलं आहे. शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी पुलाच्या कामाची पाहणी करत लवकरच हा नागरिकांसाठी खुला केला जाईल, असं सांगितलं. मात्र, पूल नागरिकांसाठी खुला न झाल्यानं मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आणि त्यांनी पुलाची पाहणी केली. त्यामुळे येत्या निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

मनसेचे राजू पाटील काय म्हणाले?

मनसेचे माजी आमदार राजू पाटील म्हणाले की, 'एकत्र येण्याच्या चर्चा वेगळ्या लेव्हलवर चालू आहेत. आम्ही एकत्र स्थानिक लेव्हलला आलेलो आहोत. स्थानिक आमदारांनी सांगितलं होतं पूल अनावरण करणार म्हणून आम्ही पाहायला आलो आहोत. काल दिपेशजींचा मला फोन आला होता. पुलाची पाहणी करायला जाणार, त्यांनी विचारलं तुम्ही याल का? त्यावर एकत्र पाहणी करूया, असं मी म्हणालो. चांगल्या कामाला एकत्र येणं काय हरकत नाही? याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. युती, आघाडी होईल नाही होईल ते वरिष्ठ निर्णय घेतील. स्थानिक लेव्हलचं राजकारण कसं करायचं, काय करायचं, एवढं ज्ञान आम्हालाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही एकत्र आलोय', असं राजू पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे काय म्हणाले?

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले की, 'स्थानिक प्रश्नांसाठी आम्ही एकत्र येत असतो. आम्ही स्थानिक प्रश्नांसाठी राजू पाटील यांच्या संपर्कात आहोत. दरम्यान या पुलासाठी राजू पाटील सुद्धा पाठपुरावा करतात. आम्ही सुद्धा करत आहोत. सात वर्ष झाले परंतु सत्ताधारी पक्षांकडून फक्त आश्वासन दिली जात आहे. सात वर्ष झाले पण पूल चालू झाला नाही. ३१ तारखेला या पुलाचं काम पूर्ण होणार होतं आणि लोकांसाठी सुरू होणार म्हणून आम्ही पाहण्यासाठी आलो होतो. पण इथे उद्घाटनाला कोणीही दिसलं नाही. आमदार नाही, स्थानिक नेते नाही. कोणी दिसलं नाही', असं दीपेश म्हात्रे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT