Dilip Walse Patil Saam TV
मुंबई/पुणे

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

पोलिस यंत्रणेने कठोर पावले उचलावी, कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना ताब्यात घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेली भूमिका तसंच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमधील सभेत अल्टिमेटमबाबत पुन्हा केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आला असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था शांत राहावी यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश गृहंत्र्यांनी दिले आहेत.

तसंच पोलिस यंत्रणेने (Police system) कठोर पावले उचलावी, कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना ताब्यात घ्या. खबरदारी म्हणून त्यांना नोटीस द्या. तसंच जे सामाजिक तेढ निर्माण करणारे असतील त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देखील गृहमंत्र्यांनी दिले आहेत. शिवाय राज्यातील संवेदनशील भागात प्रशासनाला अलर्ट रहायला सांगितलं आहे.

हे देखील पाहा -

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोंग्यांबाबत अल्टिमेटम दिल्यामुळे राज्यातील कायदा आमि सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे गृहखात्याने सावध भूमिका घेतली असून आज गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती यावेळी हे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यातील शांतता बिघडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी काहीजणांना सुपाऱ्या देण्यात आल्या आहेत. मात्र, सुपाऱ्या घेतलेल्या लोकांध्ये तेवढी ताकद नाही. त्यामुळे कोणी कितीही मनात आणले तरी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका नसल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT