पुण्यातील धक्कादायक प्रकरणात पोलिसांवरच अपहरण आणि खंडणीचा आरोप.
एका कुटुंबाचे अपहरण करून ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप.
सहा आरोपींपैकी पाच पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असं पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे. या ब्रीद वाक्याचा अर्थ म्हणजे, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा (गुन्हेगारांचा) नायनाट करणे पण पुण्यातील पोलिसांचे कृत्य पाहून संपूर्ण राज्याची मान शरमेनं खाली गेली आहे. तर पोलीस विभागावरील सामन्य व्यक्तींचा विश्वास उडालाय. पोलीस गुन्हेगारांना दंड देत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देतात. पुण्यातील पोलिसांना खंडणीसाठी एका कुटुंबाचे अपहरण केलं. याप्रकरणात 6 पैकी 5 पोलिसांना अटक करण्यात आली आहे.
पुणे शहरातील विमाननगर परिसरात राहणारे भूषित शर्मा आणि त्यांचे मित्र मोहम्मद हे कुटुंबासह 5 जुलैला फिरायला गेले होते. त्यादिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कामशेत परिसरात पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. तुमच्या गाडीत ड्रग्ज आहेत, असं सांगून पोलिसांनी त्यांचे अपहरण केलं. त्यानंतर या पोलिसांनी अपहरण केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांकडून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली.
अपहरण करणाऱ्या पोलिसांना शर्मा आणि त्यांच्यासोबत असलेल्या मोहम्मद आझमी यांच्या कुटुंबियांना रात्री आठ वाजेपर्यंत कारमध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत होते. त्यावेळी तळेगावजवळ एटी एममधून पैसे काढताना कुटुंबातील एका मुलाने हातातील स्मार्ट वॉचच्या सहाय्याने नातेवाईकांना मेसेज करून या अपहरणाची माहिती दिली.
भूषित शर्मा यांच्या कुटुंबातील एका मुलाने स्मार्ट वॉचच्या मदतीने नातेवाईकांना मेसेज केला होता. आपल्यासोबत घडलेल्या अपहरणाच्या नाट्यमय घडामोडींची माहिती दिली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड पोलिसांना संपर्क केला त्यांना सर्व परिस्थिती सांगितली.त्यानंतर पोलिसांनी आपली पथके शर्मा यांच्या शोधार्थ रवाना केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल सहा पोलिसांनी हे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार त्यानंतर उघडकीस आला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सहापैकी ५ पोलिसांना अटक करण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या सहा पोलिसांना अटक करण्यात आलीय. पुणे ग्रामीण पोलिसांनी आधी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करावा लागला आहे. पुणे जिल्ह्यातील कामशेतजवळ अपहरणाचा हा प्रकार घडला होता.
१.पोलिस नाईक अमोल वायकर
२.पोलिस कॉन्स्टेबल अमोल ननावरे
३.पोलिस कॉन्स्टेबल तुषार धावरे
४.वॉर्डन किसन बोंबळे
५ वॉर्डन नितेश चव्हाण
६ वॉर्डन तुषार घाडगे
सहा पोलिसांना अटक करुन आज वडगाव मावळच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र पोलिसांनी त्यांची नावे एफ आय आर मधे घेतलेली नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.