आम्हाला मारू नका, आम्हाला जगू द्या : शिवसेना नेत्याचा गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप  Saam Tv
मुंबई/पुणे

आम्हाला मारू नका, आम्हाला जगू द्या : शिवसेना नेत्याचा गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा- शिवसेनेमध्ये बिनसल्यावर शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली

रोहिदास गाडगे

पुणे : राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा- शिवसेनेमध्ये बिनसल्यावर शिवसेनेने थेट काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. २०१९ च्या निकालानंतर राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. यामध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापना करत भाजपाला (BJP) विरोधी बाकांवर बसवले आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळवले. पण दोन्ही काँग्रेसने सत्तेत भागीदारी मिळवली आहे.

मात्र राज्य पातळीवर ही महाविकास आघाडी आजून देखील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रुचली नाही. राज्यामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पक्षातील कुरबुरी सध्या समोर येत आहेत. त्यामध्ये आता पुणे जिल्ह्यातील शिवसेना(Shivsena) नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalarao Patil) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर(NCP) गंभीर आरोप यावेळी केला आहे. महाविकास आघाडी आम्ही मान्य केली असून आम्ही आघाडीची तत्वे देखील पाळत आहोत.

हे देखील पहा-

परंतु, शिवसेना संपवण्याचा डाव हा जिल्ह्यामध्ये सध्या सुरु आहे. आमचे अस्तित्व राहू द्या. आमची जास्त काही मागणी नाही. शिवसैनिकाला सुखाने तरी जगू द्या असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीविषयी मागील २ वर्षापासून खूप वाईट अनुभव आले आहेत. खेड तालुक्यात पंचायत समितीचे सभापती ६ महिने जेलमध्ये राहावे लागले आहे. लांडेवाडी येथील होणारी बैलगाडा शर्यत रद्द करण्याकरिता अनेकांनी प्रयत्न केले आहे.

बैलगाडा शर्यतीमध्ये परवानगी मिळाल्यानंतर पहिली बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केली होती म्हणून ती इतरांच्या डोळ्यामध्ये जास्त प्रमाणात खूपली आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. हे सगळे कारस्थान जिल्ह्यातील विरोधक आणि प्रशासनाने एकत्र मिळून केले आहे. शिवसैनिकांना जगू द्या, शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आमचे अस्तित्व राहू द्या. आम्हाला मारु नका. गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

आम्ही कुणाच्या नादी लागत नाही. आम्हाला जगू द्या. वरिष्ठांच्या कानावर प्रत्येकवेळी या गोष्टी सांगत आहोत अशी खंत शिवाजी आढळराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे. गेल्या खेड पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आमने- सामने आल्याचे दिसून आले आहे. याठिकाणचे खेडचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार विरोधात शिवसेना नेते आढळराव पाटील यांनी खूपवेळा आरोप केले आहे. या आरोपाचे पडसाद राज्य पातळीवर देखील उमटले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहो अथवा न राहो खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल असे राऊतांनी त्यावेळी म्हटले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT