Sharad Pawar
Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु; शरद पवारांनी सारं काही उलगडून सांगितलं

साम टीव्ही ब्युरो

Sharad Pawar News: माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या कथित १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जामीनावर तरुंगाबाहेर आहेत. अनिल देशमुख यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडी कारायावायांवर शरद पवारांनी भाष्य करत सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु असल्याची टीका केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी ईडी कारवायांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले, 'अनिल देशमुख यांना १३ ते १४ महिने तुरुंगात ठेवलं. एका शैक्षणिक संस्थेसाठी १०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. सतत चौकशीनंतर आरोप जे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये १०० कोटींची रक्कम ही २० कोटी रुपयांवर आली. याचा अर्थ अतिरंजीत अशा प्रकारचे आरोप केले जातात'.

'लोकांच्या समोर सुरूवातीला १०० कोटींचे आरोप गेले. त्यामुळे लोकांना धक्का बसला होता. त्यांची बदनामी करण्याचे काम केलं”, असे शरद पवार पुढे म्हणाले.

'अनिल देशमुखांनी शैक्षणिक संस्थेसाठी घेतलेली रक्कम अजूनही त्या शैक्षणिक संस्थेच्या खात्यात आहे. ती रक्कम खर्चही झालेली नाही. यावरून अनिल देशमुखांना १३ ते १४ महिने तुरुंगवास म्हणजेच सध्याचे शासन हे सत्तेचा कसा गैरवापर करत आहे. याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे शरद पवार पुढे म्हणाले.

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'माझ्याकडे पूर्ण माहिती नाही, पण महाराष्ट्रात चांगले काम करणारे प्रशासक असे जयंत पाटील यांचे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांना कशासाठी बोलावलं याची कल्पना नाही. ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर कसा होतो याच हे उदाहरण आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT