मुंबई - वसई विरार मध्ये पाण्याचा पुरवठा कमी होत असलेल्या ने वसई विरार मधिल विविध भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. केवळ ड्रम भर पाण्यासाठी लोककांना वणवण करावे लागत आहे. विरार मधिल सरकार नगर, जीवदानी पाडा, आंबेडकर नगर, फुलपाडा, त्रिमूर्ती नगर अश्या विवध ठिकाणी पाणी आठवड्यातुन केवळ 2 दिवस येते,त्यातही पाण्याचा दाब कमी असल्या मुळे लोकांनी हंडा भर पाणी भरण्यासाठी 2 तास वाट पहात बसावे लागत आहे.
हे देखील पाहा -
पाण्याची साठवणूक करण्यासाठी आता ड्रमच्या चोरी देखील होण्याची सुरवात झाली आहे.असच एक प्रकार विरार मधिल सरकार नगर परिसरात घडला आहे. 2 अल्पवयीन मुले चक्क ड्रम चोरताना सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे.नागरिकांनी या दोन्ही मुलांना चोप देत समज देऊन सोडून दिले आहे.
एकीकडे वसई विरार मध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे तर दुसरीकडे पाण्यासाठी लोककांनी वणवण करावी लागत.महापालिका व स्थानिक परशासन केवळ लोककांनी आश्वासन देते मात्र देते,मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचे तोडगे काडत नाही असे लोककांनी आरोप केले आहेत.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.