नवी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नवी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार, आज दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सकाळचे आणि सर्वसाधारण सत्र सुरू असलेल्या शाळांना विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा प्रशासनाने पालकांना तात्काळ माहिती देऊन विद्यार्थ्यांना सोडावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासन सतर्क असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.