Drown saam tv
मुंबई/पुणे

विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू; सह्याद्री स्कूलचे चार शिक्षक निलंबित

ही घटना 19 मे राेजी घडली हाेती. त्यानंतर नातेवाईकांनी शिक्षकांवर कारवाईची मागणी केली हाेती.

रोहिदास गाडगे

राजगुरुनगर : कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूलमधील (krishnamurti foundation sahyadri school) चार विद्यार्थ्यांच्या (students) चासकमान धरणामध्ये बुडून मृ्त्यू झाल्या प्रकरणी शाळा प्रशासनासह चार शिक्षकांवर (teachers) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान संबंधित चार शिक्षकांना शाळा (school) प्रशासनाने निलंबित केले आहे. (sahyadri international school chaskaman latest marathi news)

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणा-या चासकमान धरणात सह्याद्री स्कुलमधील दहावीतील चार विद्यार्थ्यांचा 19 मे रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये मृतांमध्ये परीक्षित कुलदिप अग्रवाल (वय १६), नव्या प्रज्ञेश भोसले (वय १६), रितीन डी. धनशेखर ( वय १६), तनिषा हर्षद देसाई (वय १६) यांचा समावेश आहे.

या घटनेनंतर संबंधित मुलांच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनास जबाबदार धरत कारवाईची अपेक्षा पाेलीसांकडे व्यक्त केली हाेती. त्यावेळी घटनेचा कसून तपास करुन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी नातेवाईकांना दिले हाेते.

दरम्यान तपासाअंती पाेलीसांनी शाळा प्रशासनासह चार शिक्षकांवर चार विद्यार्थ्यांच्या मृत्यु प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनाने विनायक शर्मा, श्रीनिधी महिशी, ओमना संताेष आणि जाँल्सी थाँमस यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची अंतर्गत चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT