Rajya Sabha Election: बिनविरोध होणारी निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता
Rajya Sabha Election: बिनविरोध होणारी निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता Saam Tv
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election: बिनविरोध होणारी निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

पुणे: राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी राज्यसभेची (Rajyasabha Election) निवडणुक लढवण्याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला आहे. त्यामुळे बिनविरोध होईल असा अंदाज असलेली ही निवडणुक आता चुरशीची होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे एप्रिल महिन्यात निधन झालं होतं. त्यानंतर या जागेसाठी निवडणुक प्रक्रिया आता पार पडत आहे.

२२ सप्टेंबर पर्यंत या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असुन ॲाक्टोबर मध्ये निवडणुक पार पडणार आहे. काँग्रेस कडून उमेदवारीसाठी राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव इच्छुक आहेत. तर याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा आहे. ही निवडणुक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.

राज्यसभेतलं पक्षीय बलाबल लक्षात घेता ही निवडणुक कॅांग्रेससाठी महत्वाची आहे. संख्याबळाच्या गणितासाठीही निवडणुक महत्वाची समजली जात आहे. अनेक नेते रिटायर होणार असल्याने कॅांग्रेसला सभागृहात अनुभवी नेत्यांची गरज आहे. भाजपने उमेदवार उभा न करता निवडणुक बिनविरोध करण्याचं कॅांग्रेसचं समोर आवाहन आहे. भाजप मात्र २२ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT