Vasant More  Saam Tv
मुंबई/पुणे

"राज ठाकरेंची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून अडचणीत"- वसंत मोरे

राज ठाकरेंच्या भाषणानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्याच्या निमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर आघाडीवर टिका देखील केली होती. यामुळे महाराष्ट्रात राजकीय (Political) वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणामध्ये राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयावर हात घातला आहे. मशीदवरील भोंगे पाहिजे. अन्यथा त्यांच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा लावली जाणार आहे, असा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता.

हे देखील पहा-

दरम्यान राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेला पुण्यात दुसरा धक्का बसला आहे. कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांचा मनसेचा राजीनामा दिला आहे. जिल्हा अध्यक्ष रवींद्र गारुडकर यांच्याकडे दिला राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज होऊन त्यांना हे पाऊल उचललं आहे. या दोघांचीही मनधरणी करणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे

यावरून महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीका देखील होऊ लागली आहे. तर राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये (districts) भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसेसैनिक करू लागले आहेत. यातच पुण्यामधून (Pune) एक धक्कदायक प्रकार समोर आला होता. एका मनसैनिकाने राजीनामा दिल्याचे पत्र नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना पाठवले होते. यावर नगरसेवक वसंत मोरे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठे झालो. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले आहे.

मोरे यांनी पुढे म्हणाले की, मी कधी देखील ठाकरे साहेबांवर नाराज होणार नाही. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून, भूमिका लक्षात घेतली जाणार आहे, तर १५ वर्षे ज्या भागामध्ये लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्याबरोबर आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणावर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठे झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. यामुळे मन व्यथित झाले आहे. मशीदवरील भोंगे विषयी अगोदर देखील तक्रारी आले होते.

राज्य सरकारने त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. भोंगे काढले नाही तर आम्ही मशीद समोर हनुमान चालीसा लावणार असे राज साहेब म्हणाले आहेत. याविषयी आमची अजून मिटिंग होणार आहे. यावर आम्ही विचार करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. वादाचे विषय होणार आहे, असा मुस्लिम बांधवानी गैरसमज करून घेऊ नये असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT