Thane News Saam tv
मुंबई/पुणे

Thane Tourist Places: कोंडेश्वर, बारवी धरणासह या पर्यटन क्षेत्रांवर मनाई आदेश लागू

अजय दुधाणे

Thane News: पावसाळा सुरू झाल्यावर अनेकांची पावले पर्यटनासाठी निघत असतात. मुंबईजवळील अंबरनाथ तालुक्यात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. गेल्या पाच-सहा वर्षात या क्षेत्रात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, बारवी धरणासह इतर पर्यटन क्षेत्रांवर ३० ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

गेल्या महिन्यातही या पर्यटन क्षेत्रात अपघाताच्या घटना घडल्या. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर मनाई आदेश लागू करण्यात आलेत. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू राहतील,अशी माहिती अंबरनाथच्या नायब तहसीलदार दीपक अनारे यांनी दिली आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर,भोज धरण,बारवी नदी, चिखलोली अशी जवळपास दहा ते बारा पर्यटन क्षेत्र आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पावसाळी सहली आणि पिकनिकसाठी येत असतात.

पर्यटन क्षेत्रात आल्यानंतर पाण्याचा अंदाज न येणं, मद्यपान करून पाण्यात उतरणं अशा अनेक गोष्टींमुळे दरवर्षी अनेक पर्यटकांचा मृत्यू होतो, तर अनेकांचे अपघात होत असतात म्हणून यंदाच्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

३० ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार असून यादरम्यान या सर्व पर्यटन क्षेत्रांच्या ३ किलोमीटरच्या परिघात जाण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती अंबरनाथच्या नायब तहसीलदार दीपक अनारे यांनी दिली आहे.

नायब तहसीलदार दीपक अनारे यांच्या आदेशानंतर पर्यटकांना तालुक्यातील पर्यायी पर्यटन क्षेत्रावर जावं लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

SCROLL FOR NEXT