Kalyan: चौदा गाव आणि शीळ परिसरात प्रदूषणाचा गुंता सुटता सुटेना... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan: चौदा गाव आणि शीळ परिसरात प्रदूषणाचा गुंता सुटता सुटेना...

चौदा गाव आणि शीळ परिसरात केमिकल आणि भंगार माफियांनी घातला आहे हैदोस घातला आहे. मात्र प्रदूषण महामंडळ याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: शीळफाटा लागून असलेल्या आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या १४ गावांमधील प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदीस वाढत चालला आहे. पावसाळ्यात नदी पात्रात आणि शेतात केमिकल सोडल्यानंतर आता थंडीच्या दिवसात केमिकल मिश्रित कचऱ्याच्या गोण्या थेट उघड्यावर जाळल्या जात असल्याने हा प्रदूषणाचा गुंता सुटणार तरी कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही ठीकाणी केमिकलयुक्त रसायन हे जमिनीत गाडले जात आहे. याबद्दल  मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र प्रदूषण महामंडळ याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे हे गोरखधंदे थांबणार कधी? आणि १४ गावांचा प्रदूषणाचा गुंता कधी सुटणार असा प्रश्न सध्या निर्माण आहे. (Pollution in 14 villages and Shil area will not go away)

हे देखील पहा -

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या १४ गावांजवळ मोठ्या प्रमाणात वनविभागाची जागा आहे. या जागेवर भंगार माफियांनी ताबा मिळवला आहे आणि रात्रीच्या अंधारात सर्रासपणे केमिकल हे जमिनीमध्ये गाडले जात आहे. तर काही ठिकाणी जाळले जात आहे. १४ गावांना वायू प्रदूषणाने ग्रासले असून जल प्रदूषणास देखील सुरुवात झाली आहे. मात्र हे प्रदूषण दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. गोठेघर ते दहिसर परिसरात मोठ्या प्रमाणात वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रम करून भंगार माफियांमाकडून जामीन बळकावून गोडाऊन बांधून प्रदूषण करत वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषण महामंडळ, वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस याकडे कधी लक्ष देणारा असा सवाल उपस्थित होत आहे. 

दुसरीकडे प्रदूषणाने भात शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. तर पिण्याचे पाणी देखील पिण्यायोग्य राहणे कठीण झाले आहे. सदर ठिकाणी पूर्वी वन्यप्राणी आढळत असत, मात्र आता ते पण दिसेनासे झाले आहे. १४ गाव परिसर, मलंगगड आणि शीळ विभाग यात मोठ्याप्रमाणात केमिकल, केमिकल युक्त कचऱ्याच्या गोण्या जमिनीत गाडल्या जात आहे आणि जाळल्या जात आहेत. भंगार माफियांकडून प्रदूषण करण्यासाठी नदी पात्र किंवा डोंगराळ भागाचा आसरा घेतला जात आहे. त्यामुळे आता प्रदूषण महामंडळ, वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

SCROLL FOR NEXT