PM Modi - Eknath shinde Saam Digital
मुंबई/पुणे

Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; शिंदे गटाला तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, 'या' खासदारांना मिळणार संधी?

बीएमसी निवडणुका जवळ आल्याने राहुल शेवाळेंना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Shivaji Kale

नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अनेक इच्छुक आमदारही मंत्रिमंडळ विस्ताराची आतुरतेने वाट वाट पाहत आहेत. मात्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधीच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला तीन मंत्रीपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते. राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

बीएमसी निवडणुका जवळ आल्याने राहुल शेवाळेंना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. श्रीरंग बारणेंना मंत्रीपद देऊन पश्चिम महाराष्ट्र मजबूत करण्यावर शिंदे गटाचा भर असणार आहे. विदर्भातही प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद दिलं जाणार आहे.

प्रतापराव जाधव हे लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडणूक गेले आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. यापूर्वी सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मनोहर जोशींच्या काळात ते क्रीडा मंत्री होते.

नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल यांनी एनडीएची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या रूपानं भाजपला खंबीर साथीदार मिळाला आहे. त्यामुळे भाजपनं शिंदे गटाला तीन मंत्रीपदं देण्याचं ठरवलं असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT