Uddhav Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टाचा मोठा दणका, मुंबईतील प्रभागरचना पूर्ववत केल्याविरोधातील याचिका फेटाळली

Mumbai News : महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या 227 वरुन वाढवून वाढवून 236 केली होती.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुंबई महापालिका प्रभाग संख्येसंदर्भात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत प्रभागांची संख्या 227 कायम राहणार आहे.

मुंबई उच्च न्यायलयाने याचिकेत काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्यायमूर्ती एम डब्ल्यू चंदवाणी यांच द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या 227 वरुन वाढवून वाढवून 236 केली होती.

मात्र महाविकास आघाडीचं सरकार बदलताच शिंदे-फडणवीस सरकाने हा निर्णय रद्द करत प्रभागांची संख्या पुन्हा २२७ वर नेली होती. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भातील सुनावणी 18 जानेवारीला पूर्ण झाली होती. मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय राखून ठेवला होता. (Latest Marathi News)

याचिकेला वर्तमान राज्य सरकारचा जोरदार विरोध होता आणि त्यांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आम्ही कुठल्याही अधिसूचनेला नाही, तर कायद्याला बांधिल असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं होतं.

राज्य सरकार जसे आदेश जारी करतं त्यानुसार आम्ही काम करतो अशी भूमिका निवडणूक आयोगाने न्यायालयात मांडली होती. 236 प्रभाग संख्येनुसार निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाली होती, मात्र तेव्हा त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. त्यानंतर रातोरात सरकार बदललं आणि एका निर्णयानं सारी प्रक्रिया रद्द केल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, आठवड्याची मंत्रिमंडळ बैठक रद्द

मुंबईत ५ कोटींची हेराफेरी; सोने-हिऱ्यांच्या व्यापाराच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

Maharashtra Live News Update: अजितदादांच्या विमान अपघातावर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा: अमोल मिटकरी

राज्यातील प्रशासनात मोठी खांदेपालट; ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

SCROLL FOR NEXT