नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमक प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमक

नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी भूमिपुत्र, शेतकरी हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

डोंबिवली : नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी भूमिपुत्र, शेतकरी हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कल्याण ग्रामीण, दिवा, मलंगगड, 14 गावे आणि डोंबिवली ग्रामीण परिसरात आज मशाल मोर्चा काढण्यात आला.

नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आगरी, कोळी , कुणबी, कराडी तसेच स्थानिक भूमीपुत्रांनी 10 जूनला मानवी साखळी आंदोलन केले. यानंतर 14 जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता साधारण 350 गावात मशाल मोर्चा काढण्यात आला आहे.

स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत. ही मागणी सरकारने मान्य केली नाहीतर येत्या 16 ऑगस्टला विमानतळाचे काम बंद पाडण्यात येईल अशी घोषणा धसई गावात झालेल्या बैठकीत एकमताने भूमीपुत्रांनी आणि कमिटीचे दशरथ पाटील यांनी केली असल्याचे 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीचे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांचा न्यायलयीन कोठडी

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT