नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमक
नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमक प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमक

साम टिव्ही ब्युरो

डोंबिवली : नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी भूमिपुत्र, शेतकरी हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कल्याण ग्रामीण, दिवा, मलंगगड, 14 गावे आणि डोंबिवली ग्रामीण परिसरात आज मशाल मोर्चा काढण्यात आला.

नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आगरी, कोळी , कुणबी, कराडी तसेच स्थानिक भूमीपुत्रांनी 10 जूनला मानवी साखळी आंदोलन केले. यानंतर 14 जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता साधारण 350 गावात मशाल मोर्चा काढण्यात आला आहे.

स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत. ही मागणी सरकारने मान्य केली नाहीतर येत्या 16 ऑगस्टला विमानतळाचे काम बंद पाडण्यात येईल अशी घोषणा धसई गावात झालेल्या बैठकीत एकमताने भूमीपुत्रांनी आणि कमिटीचे दशरथ पाटील यांनी केली असल्याचे 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीचे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT