Mumbai Water Storage chatgpt
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! तलावांतील पाणीसाठ्याबाबत समोर आली मोठी अपडेट

Mumbai Water Storage : मुंबईच्या सातही तलावांतल्या पाणीसाठ्यात दोन दिवसांमध्ये मोठी वाढ झाली असून एकूण साठा ५४ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्याबद्दल मोठा दिलासा मिळाला आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे पाणीसाठ्यात सातत्याने घट होत होती. त्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता वाढलेली होती. तर, आता पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे तलावातला पाणीसाठा वाढायला सुरूवात झालेली आहे. पाणीटंचाईची भीती काहीशी कमी झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत समाधानकारक पावसामुळे सातही तलावांमधील एकूण पाणीसाठ्यात ४७ हजार ४७९ दशलक्ष लिटरची भर पडली आहे. त्यामुळे तलावांमधील एकूण पाणीसाठा ५४ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. १८ जुलै रोजी सात तलावांमध्ये ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यानंतर झालेल्या पावसामुळे २० जुलै रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत हा साठा वाढून ७ लाख ८२ हजार ३७० दशलक्ष लिटरवर पोहोचला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी भातसा तलावातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. सध्या या तलावात ३ लाख ४५ हजार ६२६ दशलक्ष लिटर पाणी साठले असून तलाव ४८ टक्के भरला आहे. मुंबईच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येची पाण्याची गरज भातसा तलावातून भागवली जाते. त्यामुळे या तलावातील वाढता साठा महत्त्वाचा मानला जात आहे.

याशिवाय तानसा तलावातील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर, तर मोडक सागर तलावातील साठा ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. हवामान खात्याने पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने तलावांमधील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या तरी पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT