Mumbai Water Supply  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Issue: टेन्शन वाढलं! मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकेच पाणी, ७ धरणांत इतकाच आहे पाणीसाठा!

Priya More

गिरीश कांबळे, मुंबई

राज्यात मान्सून (Monsoon 2024) दाखल झालाय पण अजून म्हणावा तसा पाऊस पडला नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांमध्ये देखील अद्याप मुसळधार पाऊस पडला नाही. त्यामुळे या धरणातील पाणीपातळीत मोठी घट होत चालली आहे. याच कारणास्तव मुंबईतील पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे आता टेन्शन जास्त वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये ५.३८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईत आधीच असलेल्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी अप्पर वैतरणा आणि भातसा धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे फक्त उर्वरीत ५ धरणांमधून सध्या मुंबईला पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातील पाण्याने देखील तळ गाठला असल्यामुळे टेन्शन वाढत चालले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक?

- अप्पर वैतरणा - ० टक्के

- मोडक सागर - १५.७३ टक्के

- तानसा - २२.०५ टक्के

- मध्य वैतरणा - ९.६४ टक्के

- भातसा - ० टक्के

- विहार - १७.९२ टक्के

- तुळसी - २४.४६ टक्के

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयात आज एकूण ७७,८५१ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. यामध्ये १० ते १५ टक्के पाणी कपात सध्या करण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी होत चालल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीला ५ टक्के पाणीकपात केली होती. त्यानंतर १० टक्के पाणीकपात लागू केली.

सध्या मुंबईतील अनेक ठिकाणी १० ते १५ टक्के पाणी कपात सुरू आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत ही पाणीकपात लागू असणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. पाणी कपातीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीकपात लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT