Mumbai Rickshaw Union Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Rickshaw Union: रिक्षा भाडे वाढणार? मुंबईचे रिक्षावाले हाय कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत

Mumbai Rickshaw Union News: मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचे भाडे पहिल्या दीड किमीसाठी 23 वरून 25 करण्याची मागणी मुंबई रिक्षामेन्स युनियनने केली होती, त्यासाठी डिसेंबर महिन्याची मुदत सरकारला दिली होती, पण सरकार कडून कोणतीच हालचाल नाही. त्यामुळे मुंबईचे रिक्षावाले आता हाय कोर्टात जाणार आहेत.

Sandeep Gawade

Mumbai Rickshaw Union

मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचे भाडे पहिल्या दीड किमीसाठी 23 वरून 25 करण्याची मागणी मुंबई रिक्षामेन्स युनियनने केली होती, त्यासाठी डिसेंबर महिन्याची मुदत सरकारला दिली होती, पण सरकार कडून कोणतीच हालचाल नाही. त्यामुळे मुंबईचे रिक्षावाले आता हाय कोर्टात जाणार आहेत. खटूआ समितीच्या फॉर्म्युला नुसार ग्राहक मूल्य निर्देशांक, रिक्षा विकत घेण्याचा खर्च, रिक्षांची डागडुजी करण्याचा खर्च, विमा आणि विविध कर लक्षात घेऊन रिक्षाचे भाडे ठरवण्यात येते.

ऑक्टोबर 2022 मध्ये रिक्षा भाडे 21 वरून 23 रुपये करण्यात आले होते, मात्र आता 23 वरून 25 रुपये व्हावे अशी मागणी आहे .ही मागणी एमएमआरटीए कडे करण्यात आली आहे, मात्र त्यावर सरकार कडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही, सोबत नवीन आरटीओ दंड, रिक्षा स्टँडची कमतरता, आधीची अर्धवट राहिलेली आश्वासने घेऊन रिक्षामेन्स युनियन हाय कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष थंपी कुरियन यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Election Commission : नाव नव्हे तर गावचं मतदार यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा अजब कारभार

Psychology of Couple fights : महिला की पुरुष, कोण जास्त भांडकुदळ? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

Lucky Zodiacs: धनत्रयोदशीच्या आधी 'या' राशींचे भाग्य उजळणार, आर्थिक लाभ होणार

Pakistan-Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांची युद्धबंदी,आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT