Mumbai Worli News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून दगड कोसळला, २ तरुणांचा मृत्यू; वरळीतील दुर्घटना

Mumbai Worli News : वरळीतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून दगड कोसळून दोघांचा मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मुंबई येथील वरळीमध्ये मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबईतील वरळीतील फोर सीझन रेसिडेन्सीची ही इमारत असून, बांधकाम सुरू असताना ४२ व्या मजल्यावरून मोठा दगड रस्त्यावर कोसळला. यात दोघांचा मृत्यू झाला. साबीर अली (वय ३६) आणि इम्रान अली खान (वय ३०) अशी दोघांची नावे आहेत. (Mumbai News)

हे दोघेही रस्त्यावरून जात असताना इमारतीवरून दगड कोसळला. यात ते दोघेही जखमी झाले. दुर्घटनेनंतर जवळपास अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळ हे दोघेही गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही. (Mumbai News Update)

या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दोन्ही तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दोघांचे मृतदेह नायर रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेत दोघांचा नाहक बळी गेल्यानं परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT