railway station saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway Stations : मुंबईतील 15 स्थानकांचा कायापालट होणार, काय-काय बदल होणार?

प्रविण वाकचौरे

Mumbai News : मुंबईतील १५ रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील काही स्थानकांचा विकास होणार आहे.

यामध्ये भायखळा, चिंचपोकळी, परेल, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कंजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, सँडहस्ट रोड या मुंबईतील स्थानकांचा समावेश आहे.

रेल्वे स्थानकावर सरकता जिना, प्रतीक्षा कक्ष, स्वच्छता गृह, प्रकाश दिवे, रेल्वे फलक, दिशादर्शक, वाहनतळ, या सारख्या सुविधा वाढवल्या जाणार आहेत. (Latest Marathi News)

अमृत ​​भारत योजना काय आहे?

अमृत ​​काळात विकसित झालेल्या छोट्या रेल्वे स्थानकांना ‘अमृत भारत’ असे नाव देण्यात आले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेत ही दीर्घकालीन दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. मोठ्या स्थानकांप्रमाणेच छोट्या स्थानकांची पुढील ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन पुनर्बांधणी केली जाईल. जिथे प्रवाशांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील.

रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील १२७५ रेल्वे स्थानकाच्या पूर्णविकास करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील १२३ स्थानकाचा समावेश आहे. (Maharashtra News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT