मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत ओबीसींना बसणार फटका
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत ओबीसींना बसणार फटका Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलणार?

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महानगरपालिका सभागृह पंचवार्षिक योजनेनुसार मार्च महिन्यात विसर्जित होणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी नव्याने निवडणूका घेऊन नवीन सभागृह बसणं गरजेचं आहे. पण मुंबईत निवडणुकांना विलंब होणार असल्यामुळे मुंबईत काही काळ प्रशासक लागण्याची शक्यता आहे. कारण आगामी पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची चिन्ह आहेत.

राज्य शासनाने मुंबई महापालिकेत ९ नगरसेवकांची वाढ करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईतील लोकसंख्या वाढल्यामुळे या जागा वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुके मुंबईतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे.

हे देखील पहा -

या जागा वाढवतानाच सर्व प्रभागात लोकसंख्येनुसार प्रभाग रचना होणं गरजेचं आहे. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा सर्व प्रभागांचा लोकसंख्येनुसार नवीन प्रभाग रचना करून कच्चा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. या अहवालात सुधारणा करून अमलबजावणी होण्यास आणखी विलंब होऊ शकणार आहे. असं झाल्यास फेब्रुवारीत होऊ घातलेल्या निवडणुका आणखी महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

निवडणूक आयोगाकडून पालिकेने नव्याने प्रभाग रचनेचा कच्चा मसुदा तयार करून तो अहवाल सादर केल्या नंतर त्यावर सुधारणा करून अमलबजावणी होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे . असं झाल्यास निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्या नंतर पालिकेकडून प्रभाग आरक्षण सोडतीला थोडा वेळ लागले . ही सोडत काढल्यानंतर निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकूणच सगळ्या प्रक्रिया पाहता मुंबई महापालिकेच्या निवडणुका एक महिना उशिराने होणायची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT