संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई : मुंबईच्या दहिसरमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. मुंबईच्या दहिसरमधील दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. दोन्ही कुटुंबीयांतील सदस्यांनी एकमेकांवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. एम एच बी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.
मुंबईच्या दहिसरमध्ये दोन कुटुंबीयांतील जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला. दहिसरच्या गणपत पाटील नगर परिसरात या दोन कुटुंबाची तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी एम एच बी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील दहिसर पश्चिम भागातील गणपत पाटील नगर या झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबीयांनी 2022 साली एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबीयांमध्ये वैमनस्य आहे. गणपत पाटील नगर गल्ली नंबर 14 च्या रस्त्यावर वाद झाला.
राम नवल गुप्ता याच्या नारळ विक्री स्टॉलसमोर शेख हा दारू पिऊन आल्यानंतर त्यांच्यांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोघांनी त्यांच्या मुलांना बोलावले. गुप्ताने त्याची मुले अमर गुप्ता, अरविंद गुप्ता आणि अमित गुप्ताला बोलावलं. तर हमीद नसिरुद्दीन शेखने त्याची मुले अरमान हमीद शेख, हसन हमीद शेखला बोलावलं.
दोघांमध्ये हाताने आणि धारदार शस्त्राने मारामारी झाली. सदर मारामारीमध्ये हमीद शेख, राम नवल गुप्ता(वडील) आणि अरविंद गुप्ता हे मृत झाले आहेत. तर अमर गुप्ता आणि अमित गुप्ता जखमी आहेत. हमीद शेखचे मुले अरमान शेख आणि हसन शेख जखमी आहेत. तिघांचे मृतदेह शताब्दी हॉस्पिटल येथे शवविच्छेदनकरिता पाठवले आहेत. दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. आरोपी जखमी असल्याने अटक करण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.