Mumbai Goa Highway Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणार फजिती

Mumbai Goa Mahamarg : तुम्ही जर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, उद्या म्हणजेच गुरुवारपासून सलग ३ दिवस महामार्ग ४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Satish Daud

तुम्ही जर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, उद्या म्हणजेच गुरुवारपासून सलग ३ दिवस महामार्ग ४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ११ ते १३ जुलै दरम्यान सकाळी आणि दुपारच्या वेळेत महामार्गावर ब्लॉक घेतले जाणार आहेत. कोलाड जवळील पूई येथे पुलाच्या कामानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.

महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Mahamarg) काम सध्या वेगाने सुरू आहे. कोलाड जवळील म्हैसदरा नदीवर नवीन पुल बांधण्यात येणार आहे.

त्यासाठी 5 गर्डर टाकण्यात येणार आहे. गुरुवार ११ जुलै ते १३ जुलै असे सलग तीन दिवस गर्डर टाकले जाणार आहे. त्यासाठी महामार्गावरील वाहतूक सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या काळात बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांना वाकण पाली मार्गे माणगाव असा प्रवास करता येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग प्रवास पर्यायी मार्ग

  • वाहनचालकांना वाकण - पाली - भिसेखिंड - रोहा कोलाड मार्गे मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.

  • वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.

  • याशिवाय खोपोली - पाली - रवाळजे - निजामपूर - माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्ग असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT