परतीच्या पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
रायगड, बदलापूर आणि मुंबईत जोरदार पाऊस
रेल्वे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असून प्रवाशांचे हाल होत आहेत.
राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने जोर धरलाय. रायगड आणि मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात जोदार पाऊस होतोय. बदलापुरातही तासाभरापासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. परतीच्या पावसाने रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.
हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता, त्या इशाऱ्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसापासून बदलापूर अंबरनाथ तसेच ग्रामीण पट्ट्यात सतत पाऊस पडत आहे. आजही दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका रेल्वे प्रवाशांसोबत व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसलाय. मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. तर भात पिकाचंही अतोनात नुकसान झालंय .
रायगडमध्ये जोरदार पाऊस
रायगडमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. सलग आठवडाभरापासून परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने भात पिकं धोक्यात आले आहे.अनेक ठिकाणी भाताचे पिक शेतात साठलेल्या पाण्यात पडल्याने खराब होण्याची भिती आहे. पावसाचा जोर कमी होत नसल्याने भात कापणीच्या कामांचा खोळंबा झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.