नवले पूल अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची 'मनसे'ची मागणी सागर आव्हाड
मुंबई/पुणे

नवले पूल अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची 'मनसे'ची मागणी

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआयए) व रिलायन्स इन्फ्रा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. 'मनसे'च्या रस्ते, वाहतूक व आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी रिलायन्स आणि एनएचआयए यांच्या हलगर्जीपणामुळेच या दोन निष्पाप महिलांचा बळी गेल्याचा आरोप करत पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

काल नवले पुलाजवळील सेल्फी पॉईंट येथे भीषण अपघात होऊन दोन महिला जागीच ठार झाल्या होत्या, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, अनेक ठिकाणी खचलेला रस्ता आणि अर्धवट कामे यामुळे हा महामार्ग अपघातांचे केंद्र बनला आहे. अनेकदा अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जात आहेत.

या दोन्ही संस्थांकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, अशा घटना वाढत आहेत. कात्रज बोगद्यापासून नऱ्हेपर्यंत तीव्र उतार असल्याने रबरी रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे. जेणेकरून वाहन चालकांचा वेग कमी होईल आणि अपघात घडणार नाहीत, अशी मागणी वाल्हेकर यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT