MNS Chief Raj Thackeray Slams CM Uddhav Thackeray
MNS Chief Raj Thackeray Slams CM Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरे, तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत : राज ठाकरे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा राज यांनी पत्राद्वारे (Letter) दिला आहे. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं राज ठाकरेंनी या पत्रात नमूद केलं.

हे देखील पाहा -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेत त्यांनी मशिदींवरी भोंगे काढण्यात यावे असं आवाहन सरकारला केलं होतं. जर सरकारने मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर राज्यभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं होतं. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी १ मे ला औरंदाबादमध्ये भव्य सभाही घेतली होती. त्यानुसार त्यांनी राज्य सरकारला ४ मे चा अल्टिमेटनम दिला होता. यादिवशी मनसैनिकांनी राज्यात काही ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवली होती. तेव्हा पोलीसांनी राज्यभरातील हजारो मनसैनिकांना प्रतिबंधात्नक नोटीसा पाठवल्या होत्या. तर शेकडो मनसैनिकांना ताब्यात घेतलं होतं. अजूनही अनेक मनसैनिक पोलिसांच्या रडारवर आहेत. यावरुनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. एका जाहीर पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

मशिदीवरील भोंग्याबाबत गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे आक्रमक :

२ एप्रिलला राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

४ मे ला मनसैनिकांची धरपकड

मशिदी समाेर अथवा शहरात हनुमान चालिसा (hanuman chalisa) लावण्यावरुन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मनसेचे (mns) कार्यकर्ते आणि पाेलीस दल (police) यांच्यात खटके उडाले होते. साेलापूर (solapur), धुळे (dhule), हिंगाेली (hingoli), पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथे पाेलीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे अनेक मनसैनिक सध्या भूमिगत आहेत.

राज ठाकरेंच्या पत्रात काय?

हे पत्र ट्वीट करत राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशाराच दिला आहे. राज ठाकरे म्हणाले की "राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार केलं. अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!” असं या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे, ते पाहाता मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत”, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच "मनसे कार्यकर्त्यांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत", असं देखील या पत्रात राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ 28 उमेदवारांचे अर्ज वैध

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

SCROLL FOR NEXT