aaditya Thackeray and devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray : 'भाजपशी करार झाला होता,पण...'; फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत आदित्य ठाकरेंनी सर्वच सांगितलं

Aaditya Thackeray Interview : फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला होता. यावर आता खुद्द आदित्य ठाकरेंनी 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सर्वकाही सांगितलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला होता. यावर आता खुद्द आदित्य ठाकरेंनी 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सर्वकाही सांगितलं आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तपत्रानुसार, देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरच्या प्रश्नावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. मुद्दा असा आहे की, आमचा २०२९ साली भाजपसोबत करार झाला होता, पण काही कारणामुळे तो पूर्ण झाला नाही. ऑक्टोबर, २०१४ साली देखील भाजपने करार मोडला. कारण त्यांना सर्वेक्षणात स्वबळावर निवडणूक जिंकणार असल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी २५ वर्षांची युती तोडली. भाजपची वृत्ती ही वापरा आणि फेका अशी आहे'.

शिंदे गटाच्या बंडावर भाष्य करताना आदित्या ठाकरे म्हणाले, 'शिंदे गटातील आमदार हे तुरुंगात जावं लागू नये म्हणून भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. आता संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी काम करत आहे. हुकूमशाही वृत्तीच्या पक्षापेक्षा महाविकास आघाडीसोबत काम करणे सोपे आहे'.

'महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या कंत्राटाची चौकशी होईल. या प्रकरणात मुंबई महापालिका आयुक्तांसह कोणालाही सोडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

'मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरच्या चर्चेवर आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,'एक शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं, हे महत्वाचं होतं. पण भाजपने आश्वासन पाळलं नाही. निवडणुकीत समान जागावाटपचं आश्वासन देखील पाळलं नाही. भाजपने अनेकदा वार केले आहेत'.

एकनाथ शिंदेंनी शिवसेना का सोडली, यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'ते सुरुवातीला गुजरातच्या दिशेने पळाले. 'तुरुंग की भाजप' या भाजपच्या पॉलिसीमुळे त्यांनी शिवसेना सोडली. प्रत्येक आमदारांनी तुरुंगात जावं लागू नये, म्हणून त्यांनी शिवसेना सोडली. भाजपने त्यांना बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री केलं. ते आता शहर आणि राज्य लुटत आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

SCROLL FOR NEXT