Manoj Jarange Patil Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा नवा डाव; सरकार स्थापनेनंतर उगारणार उपोषणास्त्र

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी सरकार इशारा दिलाय.... सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असल्याचा घणाघात त्यांनी केलाय... तर या पुढचं आंदोलन कुठे करणार याचीही घोषणा जरांगेंनी केली..जरांगेंनी सरकार स्थापने आधीच काय इशारा दिलाय...पाहूया...

Tanmay Tillu

मनोज जरागे पाटील हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जरांगेंनी तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर तुळजाभवानीच्या मंदिरातूनच जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा नवा डाव आखलाय. घराघरात आदोलन करण्याची हाक दिली असून मुंबईतही ध़डकणार असल्याचा इशारा जरांगेनी दिलाय. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच जरांगे उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली होती. मात्र ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर आता पुन्हा जरांगे उपोषणाची भाषा करतायत...महायुती सरकारची स्थापना होताच जरांगे पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्यानं राज्यात पुन्हा आरक्षणाचा संघर्ष सुरू होणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

चाळ माफियांचा हैदोस! १२ गुंड तोंडाला रुमाल बांधून आले, लाठ्याकाठ्यांनी महिलांना अमानुष मारहाण, अत्याचाराचा प्रयत्न

Morning Hydration: सकाळी उठताच प्या फक्त 1 ग्लास पाणी; शरीरात होतील हे 5 चांगले बदल

Weight loss: पोटाची चरबी झटक्यात वितळवतील या छोट्या बिया; कसं कराल सेवन

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदेंच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT